संत शिरोमणी रोहिदास महाराजांची ६४९वी जयंती ;
संत शिरोमणी रोहिदास महाराजांची ६४९वी जयंती ; समता, मानवता व श्रमप्रतिष्ठेचा जागर १ फेब्रुवारी २०२६ रोजी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४९वी जयंती संपूर्ण देशभरात, विशेषतः चर्मकार समाजात, मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी होत आहे. ही जयंती केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजाला समता, मानवता, स्वाभिमान आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश देणारा प्रेरणादिन ठरत आहे. जातभेद, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी आपल्या विचारांनी समाजाला माणुसकीचा खरा अर्थ समजावून सांगितला. संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा जन्म उत्तर भारतातील काशी येथे झाल्याचे मानले जाते. पंधराव्या शतकातील या थोर संताने जन्माने चर्मकार समाजातील असूनही आपल्या कर्तृत्वाने आणि विचारांनी संपूर्ण समाजाला नवी दिशा दिली. श्रमावर आधारित जीवन जगत त्यांनी “श्रम हेच खरे ईश्वरपूजन आहे” हा विचार समाजमनात रुजवला. माणसाची ओळख जातीनं नव्हे तर त्याच्या कर्माने, चारित्र्याने आणि विचारांनी होते, हे त्यांनी ठामपणे मांडले. त्यांच्या वाणीतून समता, प्रेम, बंधुता आणि मानवतेचा संदेश सातत्याने प्रव...