Posts

Showing posts from May, 2026

२७० नोटिसा... पण बुलडोझर फक्त एका ठिकाणी? पाचगणीत निवडक कारवाईच्या आरोपाने प्रशासन अडचणीत

Image
२७० नोटिसा... पण बुलडोझर फक्त एका ठिकाणी? पाचगणीत निवडक कारवाईच्या आरोपाने प्रशासन अडचणीत महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महसूल प्रशासनाने मोठी मोहीम राबविल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात ही कारवाई निवडक स्वरूपाची होत असल्याचा आरोप आता अधिक तीव्र होत आहे. मार्च २०२६ मध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या निर्देशानुसार तब्बल २७० अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र या सर्व प्रकरणांपैकी प्रत्यक्ष बुलडोझर कारवाई केवळ एका बांधकामावर झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महसूल विभागाने दिलेल्या नोटिसांमध्ये संबंधित बांधकामधारकांना सात दिवसांच्या आत स्वतःहून अनधिकृत बांधकामे हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. तहसीलदार सचिन म्हस्के यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रत्यक्षात कारवाईचा वेग मंदावल्याचे दिसून येत असून,...

सिडनी पॉईंटवर प्रशासनाचा बुलडोझर; श्रीमंतांच्या आलिशान अनधिकृत बंगल्यावर तहसीलदार मस्के यांची धडक कारवाई

Image
सिडनी पॉईंटवर प्रशासनाचा बुलडोझर; श्रीमंतांच्या आलिशान अनधिकृत बंगल्यावर तहसीलदार मस्के यांची धडक कारवाई पाचगणी प्रतिनिधी : पश्चिम घाटातील निसर्गसंपन्न आणि पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात आज महसूल विभागाने मोठी आणि ऐतिहासिक कारवाई करत सिडनी पॉईंट परिसरातील एका आलिशान कथित अनधिकृत बंगल्यावर बुलडोझर फिरवला. सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग, पोलिस प्रशासन आणि जड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही कारवाई राबविण्यात आली. या धडक मोहिमेमुळे महाबळेश्वर-पाचगणी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिडनी पॉईंट हा पाचगणीतील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील पर्यटन परिसर मानला जातो. या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर आलिशान बंगले, रिसॉर्ट्स आणि व्यावसायिक बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाने आज सकाळपासूनच कारवाईची मोहीम सुरू केली. पहाटेपासून महसूल विभागाचे अधिकारी, प...

महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश शेठ पल्लोड यांची सर्वानुमते निवड; नगराध्यक्षांसह मान्यवरांनी घेतली सदिच्छा भेट

Image
महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश शेठ पल्लोड यांची सर्वानुमते निवड; नगराध्यक्षांसह मान्यवरांनी घेतली सदिच्छा भेट महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्री. रमेश शेठ पल्लोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या गौरवपूर्ण निवडीबद्दल नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक संजय जंगम तसेच नगरसेवक रोहित ढेबे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली व हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार विलास बापू काळे आणि सचिन शिर्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शुभेच्छुकांनी पल्लोड यांना पुष्पगुच्छ अर्पण करून अभिनंदन केले. अनुभवसंपन्न पत्रकारितेचा दीर्घ प्रवास रमेश शेठ पल्लोड हे महाबळेश्वर परिसरातील पत्रकारितेतील एक अत्यंत आदरणीय व अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते महाबळेश्वर-पंचगणी परिसरातील पत्रकारितेत सक्रिय असून स्थानिक, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय विषयांवर सखोल आणि तटस्थपणे वार्तांकन करण्याचे कार्य ते निरंतर करत आले आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्...

महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश शेठ पल्लोड यांची सर्वानुमते निवड; नगराध्यक्षांसह मान्यवरांनी घेतली सदिच्छा भेट

Image
महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश शेठ पल्लोड यांची सर्वानुमते निवड; नगराध्यक्षांसह मान्यवरांनी घेतली सदिच्छा भेट महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्री. रमेश शेठ पल्लोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या गौरवपूर्ण निवडीबद्दल नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक संजय जंगम तसेच नगरसेवक रोहित ढेबे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली व हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार विलास बापू काळे आणि सचिन शिर्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शुभेच्छुकांनी पल्लोड यांना पुष्पगुच्छ अर्पण करून अभिनंदन केले. अनुभवसंपन्न पत्रकारितेचा दीर्घ प्रवास रमेश शेठ पल्लोड हे महाबळेश्वर परिसरातील पत्रकारितेतील एक अत्यंत आदरणीय व अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या अनेक दशकांपासून ते महाबळेश्वर-पंचगणी परिसरातील पत्रकारितेत सक्रिय असून स्थानिक, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय विषयांवर सखोल आणि तटस्थपणे वार्तांकन करण्याचे कार्य ते निरंतर करत आले आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्...

पत्रकार सादिक सय्यद यांच्या पाठपुराव्याला यश; तक्रारीनंतर महाबळेश्वर पोलिस ठाण्यावरील ‘मॅप्रो’ लोगो हटवलासरकारी फलकावरील खाजगी ब्रँडिंग अखेर हटले; पोलिस प्रशासनाने मान्य केली चूक, भविष्यात असे फलक न लावण्याच्या सूचना

Image
पत्रकार सादिक सय्यद यांच्या पाठपुराव्याला यश; तक्रारीनंतर महाबळेश्वर पोलिस ठाण्यावरील ‘मॅप्रो’ लोगो हटवला सरकारी फलकावरील खाजगी ब्रँडिंग अखेर हटले; पोलिस प्रशासनाने मान्य केली चूक, भविष्यात असे फलक न लावण्याच्या सूचना महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर पोलिस ठाण्याच्या अधिकृत शासकीय फलकावर खाजगी व्यावसायिक संस्थेचा लोगो प्रदर्शित केल्याचा प्रकार पत्रकार सादिक सय्यद यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर उघडकीस आला असून संबंधित फलक हटविण्यात आल्याची माहिती अधिकृत पत्राद्वारे देण्यात आली आहे. सरकार पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत महाबळेश्वर पोलिस ठाण्याने चौकशी करून संबंधित खाजगी ब्रँडिंग काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांवरील खाजगी जाहिराती आणि ब्रँडिंगच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार सादिक सय्यद यांनी सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल करून महाबळेश्वर पोलिस ठाण्याच्या अधिकृत फलकाच्या उजव्या बाजूस ‘मॅप्रो’ कंपनीचा लोगो ठळकपणे प्रदर्शित करण्यात आल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आ...

हक्काच्या जागेसाठी लढा की दहशतीचे सावट?; डोईफोडे कुटुंबाचा गुंडगिरी, धमक्या आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर गंभीर आरोप

Image
सामाईक जागेच्या वादातून वाढला संघर्ष; मारहाण, खोट्या तक्रारी आणि जीविताला धोका असल्याचा दावा महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर शहरातील देवी चौक परिसरात सामाईक जागेच्या वादातून एका कुटुंबाला गेल्या अनेक महिन्यांपासून मानसिक छळ, धमक्या, मारहाण आणि खोट्या तक्रारींचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पल्लवी जनार्दन डोईफोडे आणि त्यांच्या १५ सदस्यीय कुटुंबाने या प्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने संपूर्ण कुटुंब भीतीच्या वातावरणात जीवन जगत असल्याचा दावा केला आहे. माहितीनुसार, देवी चौक परिसरातील सुमारे १३ गुंठे सामाईक जागेवरून हा वाद निर्माण झाला आहे. संबंधित जागेमध्ये पल्लवी डोईफोडे यांच्या कुटुंबाचा सुमारे सव्वा चार गुंठे हिस्सा असून, त्याच जागेत शंकर बाबुराव डोईफोडे आणि त्यांच्या सावत्र आई नाकाबाई डोईफोडे यांचाही हिस्सा आहे. मात्र पल्लवी डोईफोडे यांचा आरोप आहे की, शंकर डोईफोडे यांनी स्वतःच्या हिस्स्यातील मोठा भाग यापूर्वीच विकला असतानाही ते त्यांच्या हक्क...

महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमला मानधन व भरतीत आरक्षणाची मागणी

Image
दोन दशकांची निस्वार्थ समाजसेवा; आधुनिक बचाव साहित्याबरोबरच स्वयंसेवकांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर परिसरातील कोणतीही दुर्घटना, खोल दरीतील अपघात, हरवलेल्या व्यक्तींचा शोध किंवा नैसर्गिक आपत्तीची घटना घडली की सर्वप्रथम मदतीसाठी धावून येणारे नाव म्हणजे महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम. गेल्या जवळपास दोन दशकांपासून ही टीम कोणत्याही शासकीय लाभाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने समाजसेवा करत आहे. मात्र जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करणाऱ्या या स्वयंसेवकांना आजही आवश्यक साधनसामग्री, आर्थिक आधार आणि शासकीय सन्मानापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत व्यक्त होत आहे. महाबळेश्वर, प्रतापगड आणि आंबेनळी घाट परिसरातील अनेक भीषण दुर्घटनांमध्ये या टीमने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शेकडो फूट खोल दऱ्यांमध्ये उतरून जखमींना बाहेर काढणे, मृतदेहांचा शोध घेणे, जंगलामध्ये हरवलेल्या व्यक्तींचा माग काढणे, पूरग्रस्त भागात मदतकार्य करणे अशा अत्यंत धोकादायक मोहिमा या स्वयंसेवकांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. अनेकदा रात्रभर सुरू असलेल्या श...

“५० रुपयांचे आमिष, शेकडो रुपयांची वसुली!”; महाबळेश्वर बाजारपेठेत पर्यटकांची लूट उघड, स्थानिकांच्या हस्तक्षेपाने पैसे परत

Image
कान साफ करण्याच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक; पर्यटन नगरीची प्रतिमा मलिन करणाऱ्या प्रकारांवर कारवाईची मागणी महाबळेश्वर प्रतिनिधी : राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. कान साफ करून देण्याचे आमिष दाखवत काही युवकांकडून पर्यटकांकडून अवाजवी रक्कम उकळली जात असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक व्यापारी व नागरिकांनी हस्तक्षेप करून पर्यटकांना न्याय मिळवून दिला. या घटनेमुळे महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळाच्या प्रतिमेला धक्का बसत असून अशा प्रकारांवर तातडीने लगाम घालण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेले महिंद्र घाडगे आणि त्यांचे सहकारी बाजारपेठेत फिरत असताना काही युवकांनी त्यांना कान साफ करून देण्याची ऑफर दिली. सुरुवातीला प्रत्येकी केवळ ५० रुपये शुल्क लागेल, असे सांगण्यात आले. मात्र कान साफ केल्यानंतर एका पर्यटकाकडून तब्बल ६०० रुपये तर दुसऱ्याकडून ४५० रुपये घेतल्याचे समोर आले. अचानक वाढीव रकमेची मागणी करण्यात आल्याने पर्य...

आंबेनळी घाटात आठ बळी गेल्यानंतरही प्रशासन झोपेत?; तुटलेले कठडे, अपुरी सुरक्षा आणि संतप्त नागरिकांचे आंदोलनाचे संकेत

Image
आंबेनळी घाटात आठ बळी गेल्यानंतरही प्रशासन झोपेत?; तुटलेले कठडे, अपुरी सुरक्षा आणि संतप्त नागरिकांचे आंदोलनाचे संकेत प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण दुर्घटनेत आठ युवकांना आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने नेमकी कोणती दखल घेतली, घाटातील सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना केली, असा प्रश्न आता सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा तसेच महाबळेश्वरला येणाऱ्या लाखो पर्यटकांचा मुख्य मार्ग असलेला आंबेनळी घाट आजही अनेक गंभीर सुरक्षाविषयक समस्यांनी ग्रासलेला असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान सुमारे ४५ किलोमीटर लांबीचा हा घाट नागमोडी वळणे, तीव्र उतार, अरुंद रस्ते आणि खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. महाबळेश्वरहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला याच घाटातून प्रवास करावा लागतो. निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा घाट अनेकदा अपघातांचे केंद्र ठरत असल्याने त्याच्या...

१५०० फूट खोल दरी, मधमाश्यांचे पोळे आणि मृत्यूशी झुंज; आंबेनळी घाटातील २४ तासांच्या थरारक रेस्क्यू मोहिमेची कहाणी

Image
१५०० फूट खोल दरी, मधमाश्यांचे पोळे आणि मृत्यूशी झुंज; आंबेनळी घाटातील २४ तासांच्या थरारक रेस्क्यू मोहिमेची कहाणी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू, सिस्केप व एसव्हीआरएसएस टीमच्या अथक प्रयत्नांना यश; आठही मृतदेह बाहेर काढण्यात यशस्वी प्रतापगड  प्रतिनिधी : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात २४ मे रोजी रात्री घडलेल्या भीषण स्कॉर्पिओ दुर्घटनेनंतर तब्बल २२ तास सुरू असलेल्या अत्यंत आव्हानात्मक बचाव आणि शोध मोहिमेला अखेर यश आले. १५०० फूट खोल दरी, निसरडा भूभाग, ओढ्याचा मार्ग, मधमाश्यांचे पोळे आणि अंधार अशा प्रतिकूल परिस्थितीत विविध बचाव पथकांनी जीवाची पर्वा न करता राबविलेल्या मोहिमेत दुर्घटनाग्रस्त आठही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. २४ मे रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्स टीमच्या ग्रुपवर आंबेनळी घाटात एक वाहन दरीत कोसळल्याचा संदेश प्राप्त झाला. माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिकेत वागदरे, सोमनाथ वागदरे आणि संकेत सावंत यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. प्राप्त लोकेशननुसार शोधमोहीम सुरू...

आंबेनळी घाट मृत्यूचा सापळा ठरतोय का?; अर्धवट कामे, हटवलेले कठडे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढला अपघातांचा धोका“जीव गेल्यानंतर मदत नव्हे, आधी सुरक्षितता द्या”; अनंत जाधव यांचा संतप्त सवाल, पावसाळ्यापूर्वी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Image
आंबेनळी घाट मृत्यूचा सापळा ठरतोय का?; अर्धवट कामे, हटवलेले कठडे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढला अपघातांचा धोका “जीव गेल्यानंतर मदत नव्हे, आधी सुरक्षितता द्या”; अनंत जाधव यांचा संतप्त सवाल, पावसाळ्यापूर्वी तातडीच्या उपाययोजनांची मागणी प्रतापगड प्रतिनिधी :   महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा आंबेनळी घाट सध्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. घाटात सुरू असलेली रस्ता दुरुस्ती, रुंदीकरण आणि संरक्षक भिंतींची कामे संथ गतीने सुरू असल्याने तसेच अनेक ठिकाणी सुरक्षा कठडे काढूनही पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नुकत्याच घडलेल्या भीषण स्कॉर्पिओ दुर्घटनेनंतर घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत शंकर जाधव यांनी प्रसारमाध्यमांना पाठविलेल्या निवेदनात आंबेनळी घाटातील वाढत्या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, महाबळेश्वर–पोलादपूर म...

मृत्यूचा घाट: आंबेनळीच्या दरीने गिळले आठ तरुण जीव कोकण सहलीचा आनंद ठरला अखेरचा; ८०० फुटांच्या अंधाऱ्या दरीत विरली आठ कुटुंबांची स्वप्ने

Image
मृत्यूचा घाट: आंबेनळीच्या दरीने गिळले आठ तरुण जीव कोकण सहलीचा आनंद ठरला अखेरचा; ८०० फुटांच्या अंधाऱ्या दरीत विरली आठ कुटुंबांची स्वप्ने प्रतापगड प्रतिनिधी, ता. २५ :  सह्याद्रीच्या  कुशीतील आंबेनळी घाट पुन्हा एकदा काळाचा साक्षीदार बनला. महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील या अत्यंत दुर्गम आणि धोकादायक घाटात रविवारी मध्यरात्री एक भीषण दुर्घटना घडली आणि कोकणातील सहलीचा आनंद मनात साठवून घरी परतणाऱ्या आठ तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव हे छोटेसे गाव या अपघाताने पूर्णतः शोकसागरात बुडाले असून संपूर्ण महाराष्ट्राला या वार्तेने हादरवून सोडले आहे. सहल होती आनंदाची, परतणे झाले अशक्य दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारा हे या मित्रांच्या सहलीचे गंतव्य होते. आसगाव येथील १८ ते २५ वयोगटातील उमल्या वयाच्या या तरुणांनी शुक्रवारी उत्साहाने कोकणाची वाट धरली. दर्याच्या लाटांशी खेळत, निळ्याशार आकाशाखाली हर्णेच्या किनाऱ्यावर त्यांनी आनंदाचे क्षण साजरे केले. शनिवारी रात्री ते सर्वजण स्कॉर्पिओ वाहनातून (एमएच ११ डीएन २३४०) आपापल्या घराकड...

आंबेनळी दुर्घटनेत बचाव पथकांची शौर्यगाथा; चौथा मृतदेह बाहेर, उर्वरित चौघांसाठी झुंज कायम

Image
आंबेनळी दुर्घटनेत बचाव पथकांची शौर्यगाथा; चौथा मृतदेह बाहेर, उर्वरित चौघांसाठी झुंज कायम प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचाव मोहिमेत रविवारी आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले. सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभिळ गावाच्या मार्गाने दरीत उतरलेल्या बचाव पथकांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ वाहनाजवळ पोहोचून चौथा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित चार जणांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमचे प्रयत्न अखंड सुरू आहेत. कुंभरोशीजवळील पोलादपूर हद्दीत पर्यटनासाठी गेलेल्या आठ युवकांची स्कॉर्पिओ वाहनासह सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच विविध स्वयंसेवी संस्थांची बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र दरीची प्रचंड खोली, निसरडे कडे, दाट जंगल आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. ...

सावित्रीच्या खोऱ्यातून रेस्क्यू टीमची मोठी कामगिरी; आंबेनळी दुर्घटनेतील तिसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश दाभिळ गावाच्या मार्गाने दरीच्या तळाशी पोहोचली बचाव पथके; उर्वरित पाच जणांसाठी शोधमोहीम सुरूच

Image
सावित्रीच्या खोऱ्यातून रेस्क्यू टीमची मोठी कामगिरी; आंबेनळी दुर्घटनेतील तिसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश दाभिळ गावाच्या मार्गाने दरीच्या तळाशी पोहोचली बचाव पथके; उर्वरित पाच जणांसाठी शोधमोहीम सुरूच प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या अवघड बचाव मोहिमेत रविवारी आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. सावित्री नदीच्या खोऱ्यातून दाभिळ गावाच्या बाजूने दरीत प्रवेश केलेल्या बचाव पथकांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ वाहनापर्यंत पोहोचत तिसरा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. यापूर्वी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित पाच जणांपर्यंत पोहोचण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आंबेनळी घाटातील कुंभरोशीजवळील पोलादपूर हद्दीत पर्यटनासाठी गेलेल्या आठ युवकांची स्कॉर्पिओ वाहनासह सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलादपूर पोलीस, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्र...

आंबेनळी घाट दुर्घटनेने राज्य हादरले; मृतांच्या कुटुंबियांना तातडीची मदत द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला निर्देश

Image
आंबेनळी घाट दुर्घटनेने राज्य हादरले; मृतांच्या कुटुंबियांना तातडीची मदत द्या – पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला निर्देश प्रतापगड प्रतिनिधी :   रायगड जिल्ह्यातील पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. स्कॉर्पिओ वाहन सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळल्याने आठ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या हृदयद्रावक घटनेबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री देसाई यांनी तत्काळ सातारा व रायगड जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्याची गती वाढविणे, मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे तसेच पीडित कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत पोहोचविण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर अंधार आणि कठीण भौगो...

बळीराजाच्या योजनेच्या आडून भूमाफियांचा धुमाकूळ?; महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत उत्खननावर कारवाईची शिवसेनेची मागणी“शेतकऱ्यांसाठीच्या पाणंद रस्त्यांचा गैरवापर करून पर्यावरणाची हानी; दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा” – तालुकाप्रमुख संभाजी भिलारे

Image
बळीराजाच्या योजनेच्या आडून भूमाफियांचा धुमाकूळ?; महाबळेश्वर तालुक्यातील अनधिकृत उत्खननावर कारवाईची शिवसेनेची मागणी “शेतकऱ्यांसाठीच्या पाणंद रस्त्यांचा गैरवापर करून पर्यावरणाची हानी; दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा” – तालुकाप्रमुख संभाजी भिलारे  पांचगणी प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतातील माल बाजारपेठेत सहज पोहोचवता यावा तसेच शेतीची कामे सुलभ व्हावीत या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ ग्रामीण भागासाठी वरदान ठरत असताना, महाबळेश्वर तालुक्यात मात्र या योजनेच्या नावाखाली काही धनदांडगे आणि स्वार्थी घटकांकडून अनधिकृत उत्खनन व बेकायदेशीर कामे सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे महाबळेश्वर तालुकाप्रमुख संभाजी भिलारे यांनी केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. शासनाच्या नियमानुसार गाव नकाशावर अस्तित्वात असलेल्या पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण आणि बारमाही स्वरूपात विकास करणे अपेक्षित आहे. महाबळेश्वर तालुक्...

सावित्रीच्या दरीतून सुरू होणार अंतिम बचावमोहीम; आंबेनळी दुर्घटनेतील सहा जणांपर्यंत पोहोचण्यासाठी रेस्क्यू टीमचे जीवापाड प्रयत्न८०० फूट खोल दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील दुसरा मृतदेहही बाहेर; दाभिळ गावाच्या मार्गाने उर्वरित सहा जणांना बाहेर काढण्याची तयारी

Image
सावित्रीच्या दरीतून सुरू होणार अंतिम बचावमोहीम; आंबेनळी दुर्घटनेतील सहा जणांपर्यंत पोहोचण्यासाठी रेस्क्यू टीमचे जीवापाड प्रयत्न ८०० फूट खोल दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील दुसरा मृतदेहही बाहेर; दाभिळ गावाच्या मार्गाने उर्वरित सहा जणांना बाहेर काढण्याची तयारी प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष आता सुरू असलेल्या बचाव मोहिमेकडे लागले आहे. तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओ वाहनातील दुसरा मृतदेहही रविवारी बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून उर्वरित सहा जणांपर्यंत पोहोचण्यासाठी आता सावित्री नदीच्या खोऱ्यातून पर्यायी मार्गाने मोहीम राबविण्यात येणार आहे. अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या बचाव पथकांच्या अथक प्रयत्नांमुळे ही मोहीम पुढे सरकत आहे. आंबेनळी घाटातील कुंभरोशीजवळील पोलादपूर हद्दीत हा भीषण अपघात घडला. पर्यटनासाठी गेलेल्या आठ युवकांची स्कॉर्पिओ वाहनासह खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्...

सावित्रीच्या दरीतून सुरू होणार मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम; आंबेनळी दुर्घटनेतील सहा जणांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान८०० फूट खोल दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील दोघांचे मृतदेह बाहेर; दाभिळ गावाच्या मार्गाने बचाव पथकांचा नवा प्रयत्न

Image
सावित्रीच्या दरीतून सुरू होणार मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम; आंबेनळी दुर्घटनेतील सहा जणांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान ८०० फूट खोल दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील दोघांचे मृतदेह बाहेर; दाभिळ गावाच्या मार्गाने बचाव पथकांचा नवा प्रयत्न प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातील भीषण दुर्घटनेनंतर आता उर्वरित सहा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी नवी रणनीती आखली आहे. तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओ वाहनापर्यंत थेट पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सावित्री नदीपात्राच्या दिशेने दरीत प्रवेश करून दाभिळ गावाच्या बाजूने मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया यांनी दिली आहे. या निर्णयामुळे बचाव मोहिमेच्या पुढील टप्प्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आंबेनळी घाटातील कुंभरोशीजवळील पोलादपूर हद्दीत घडलेल्या या भीषण अपघातात पर्यटनासाठी गेलेल्या आठ युवकांची स्कॉर्पिओ वाहनासह खोल दरीत पडल्याची घटना उघडकीस आली. या अपघाताने सातारा जिल्हा शोकमग्न झाला असून कुटुंबीयांवर द...

आंबेनळी घाटात काळाचा घाला; ८०० फूट दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील आठ जणांवर मृत्यूची छायारात्रभर सुरू राहिले जीवघेणे बचावकार्य; एका मृतदेहाला बाहेर काढण्यात यश, सातारा जिल्ह्यावर शोककळा

Image
आंबेनळी घाटात काळाचा घाला; ८०० फूट दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील आठ जणांवर मृत्यूची छाया रात्रभर सुरू राहिले जीवघेणे बचावकार्य; एका मृतदेहाला बाहेर काढण्यात यश, सातारा जिल्ह्यावर शोककळा प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण सातारा जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. कुंभरोशी परिसरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटातील तब्बल ८०० फूट खोल दरीत एक स्कॉर्पिओ वाहन कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाहनात एकूण आठ जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून, या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव पथकाला आतापर्यंत एका मृतदेहाला दरीतून बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधील प्रवासी सातारा जिल्ह्यातील विविध भागांतील रहिवासी होते. त्यामध्ये आसगाव येथील रितेश राजेंद्र लोखंडे (२२), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), महेश अनिल पवार (२५) व आदित्य अशोक साळुंखे (२१), मर्ढे येथील...

आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; ८०० फूट दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील आठही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती

Image
आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना; ८०० फूट दरीत कोसळलेल्या स्कॉर्पिओतील आठही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती रात्रभर सुरू राहिले शोध व बचावकार्य; डीवायएसपी शंकर काळे, तहसीलदार कपिल घोरपडे, एपीआय आनंद रावडे यांच्यासह विविध यंत्रणा घटनास्थळी प्रतापगड प्रतिनिधी : महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली असून, कुंभरोशी परिसरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर पोलादपूर हद्दीत एक स्कॉर्पिओ वाहन तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे. या वाहनामध्ये एकूण आठ प्रवासी प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात असून, अधिकृत पुष्टी बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात शनिवारी उशिरा रात्री किंवा रविवारी पहाटेच्या सुमारास झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहनातील प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने आणि अपघाताची शक्यता वाटल्याने संबंधित नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन व इतर तां...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!