Posts

Showing posts from July, 2026

रानगव्यांचा धुमाकूळ! खांबील–पोकळे येथे गरीब शेतकरी महिलेच्या भातशेतीचे अतोनात नुकसान; वन विभागाकडे तातडीच्या मदतीची मागणी

Image
रानगव्यांचा धुमाकूळ! खांबील–पोकळे येथे गरीब शेतकरी महिलेच्या भातशेतीचे अतोनात नुकसान; वन विभागाकडे तातडीच्या मदतीची मागणी तापोळा प्रतिनिधी  महाबळेश्वर तालुक्यातील खांबील–पोकळे गावात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्यांचा वावर वाढला असून, एका गरीब शेतकरी महिलेच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खांबील–पोकळे येथील नंदा बाळू कदम या एकट्याच शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या दोन दिवसांत रानगव्यांच्या कळपाने त्यांच्या भातशेतीत घुसून मोठ्या प्रमाणात पिकाची नासधूस केली. कष्टाने उभे केलेले भातपीक अक्षरशः तुडवून टाकल्याने त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात रानगव्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, वारंवार शेतात घुसून ते भात, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेता...

आर्थर सीट मार्गावर नागपूरच्या पर्यटकांची बस चिखलात रुतली; सहा तासांच्या शर्थीच्या बचावमोहीमेनंतर सर्व पर्यटक सुखरूप

Image
आर्थर सीट मार्गावर नागपूरच्या पर्यटकांची बस चिखलात रुतली; सहा तासांच्या शर्थीच्या बचावमोहीमेनंतर सर्व पर्यटक सुखरूप महाबळेश्वर | प्रतिनिधी सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील रस्त्यांची स्थिती बिकट झाली असून, शुक्रवारी आर्थर सीट पॉईंटकडे जाणाऱ्या मार्गावर नागपूरहून आलेल्या पर्यटकांची बस चिखलात खोलवर रुतल्याची घटना घडली. बसमध्ये असलेल्या पर्यटकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक प्रशासन, पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तब्बल सहा तास चाललेल्या अथक बचावकार्यानंतर बस सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे , महाबळेश्वर ट्रेकर्सचे बाबा भाटिया , महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील , महाबळेश्वर पोलीस दलातील आकाश दळवी , सतीश साळुंखे , अमित कोळी तसेच जीसीपी ऑपरेटर अविनाश शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय अनेक स्थानिक युवकांन...

नरवीर तानाजींच्या जन्मभूमीत पुन्हा भूस्खलनाचा धोका! गोडवलीतील शेतजमीन खचली; १०० फूट लांबीच्या भेगांनी ग्रामस्थांमध्ये भीती

Image
नरवीर तानाजींच्या जन्मभूमीत पुन्हा भूस्खलनाचा धोका! गोडवलीतील शेतजमीन खचली; १०० फूट लांबीच्या भेगांनी ग्रामस्थांमध्ये भीती तपनेश्वर मंदिरालगतची जमीन पुन्हा खचली; १२–१३ वर्षांपासूनची समस्या कायम, भूवैज्ञानिकांकडून अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजनेची ग्रामस्थांची मागणी पाचगणी / महाबळेश्वर | प्रतिनिधी पाचगणी आणि परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व मुसळधार पावसाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले असून, त्याचे गंभीर परिणाम आता डोंगराळ भागात दिसू लागले आहेत. पाचगणी शहरालगत आणि नरवीर तानाजी मालुसरे यांची ऐतिहासिक जन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील प्रसिद्ध तपनेश्वर मंदिरालगत असलेली शेतजमीन अचानक मोठ्या प्रमाणात खचली असून, जमिनीत सुमारे १०० फूट लांबीच्या आणि तीन ते चार फूट खोल भेगा पडल्या आहेत. कालपासून पावसाचा जोर वाढल्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. गोडवली हे ...

जीव महत्त्वाचा, प्रवास थांबवा'; भाऊ मोरे यांचे रात्री तापोळा–महाबळेश्वर मार्ग टाळण्याचे आवाहन

Image
'जीव महत्त्वाचा, प्रवास थांबवा'; भाऊ मोरे यांचे रात्री तापोळा–महाबळेश्वर मार्ग टाळण्याचे आवाहन रस्ता पाच फूट खचल्याने रात्री बॅरिकेट्स; १०५ गावांच्या नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, सामाजिक कार्यकर्ते भाऊ मोरे यांची विनंती महाबळेश्वर | प्रतिनिधी महाबळेश्वर–तापोळा या १०५ गावांच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या प्रमुख मार्गावरील धोका अद्याप कायम असून, नागरिकांनी रात्रीच्या वेळी या मार्गाने प्रवास करू नये, असे महत्त्वाचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते भाऊ मोरे यांनी केले आहे. रस्त्याचा काही भाग मोठ्या प्रमाणात खचल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा इशारा देण्यात आला आहे. भाऊ मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी रस्त्याचा खालचा भाग जवळपास पाच फूट खचला असून, फक्त थोडीशी जागा वाहतुकीसाठी उरली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात वाहनांची ये-जा करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी बॅरिकेट्स उभारून रात्रीची वाहतूक बंद करण्यात आली असून, नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत रात्री या मार्गाचा वापर करू नये...

डोंगरच कोसळला, १० हेक्टर शेती गाडली! देवसरेतील शेतकऱ्याची प्रशासनाकडे विशेष आपत्ती मदतीची आर्त हाक

Image
डोंगरच कोसळला, १० हेक्टर शेती गाडली! देवसरेतील शेतकऱ्याची प्रशासनाकडे विशेष आपत्ती मदतीची आर्त हाक महाबळेश्वर | प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील देवसरे गावात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण भूस्खलनात तब्बल १० हेक्टर शेतजमीन उद्ध्वस्त झाल्याचा दावा करत शेतकरी मारुती रामचंद्र जाधव यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांकडे तातडीने संयुक्त पंचनामा करून विशेष आपत्ती भरपाई व सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर निवेदन सादर केले असून प्रशासनाने त्वरित प्रत्यक्ष पाहणी करून मदत करावी, अशी विनंती केली आहे. अर्जानुसार, ७ व ८ जुलै २०२६ रोजी देवसरे परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे लगतचा डोंगर कोसळून मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. या दुर्घटनेत गट क्रमांक ३५ आणि ३७ मधील त्यांच्या मालकीच्या व सामायिक हिस्स्यातील सुमारे १० हेक्टर क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर दगड, माती आणि चिखल साचल...

'कांदाटीतील १६ गावे संवेदनशील क्षेत्रात नकोत'; कोयना धरण, व्याघ्र प्रकल्पानंतर आता पश्चिम घाट योजनेचाही फटका? – एच. बी. जंगम यांचा सवाल

Image
'कांदाटीतील १६ गावे संवेदनशील क्षेत्रात नकोत'; कोयना धरण, व्याघ्र प्रकल्पानंतर आता पश्चिम घाट योजनेचाही फटका? – एच. बी. जंगम यांचा सवाल ✍️ संतोष मालुसरे, तापोळा | प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यातील १६ गावांचा पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात समावेश करण्याच्या हालचालींना तीव्र विरोध करत ज्येष्ठ नेते एच. बी. जंगम यांनी केंद्र व राज्य सरकारकडे ही गावे संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याची मागणी केली आहे. या विषयावर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीकडे हरकती नोंदविण्यासाठी स्थानिकांनी एकजूट दाखवण्याचे आवाहनही त्यांनी केले. जंगम म्हणाले की, कोयना धरण उभारल्यानंतर कोयना अभयारण्य अस्तित्वात आले, त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प लागू झाला आणि आता पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकल्पांचा सर्वाधिक परिणाम कांदाटी खोऱ्यावर झाला असून, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ अनेक वर्षांपासून विविध निर्बंधांचा सामना करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्याघ्र प्रकल्पामुळे सहा गावे कोअर झोनमध्ये , तर आठ गावे बफ...

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! अंधारीचे सुपुत्र सागर शेलार यांची जागतिक मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

Image
साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! अंधारीचे सुपुत्र सागर शेलार यांची जागतिक मिक्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड ✍️ संतोष मालुसरे, तापोळा | प्रतिनिधी सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी म्हणजे अंधारी गावचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि आशियाई सुवर्णपदक विजेते सागर शेलार यांची भारतीय मिक्स बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या जागतिक आंतरराष्ट्रीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून सागर शेलार भारतीय खेळाडूंचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या दीर्घकालीन मेहनतीला, आंतरराष्ट्रीय अनुभवाला आणि प्रशिक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याला मिळालेली ही मोठी दाद मानली जात आहे. सागर शेलार यांनी खेळाडू म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यानंतर प्रशिक्षक म्हणूनही अनेक ...

मुख्यमंत्री फडणवीसांकडे पंचक्रोशीच्या विकासासाठी पुन्हा साकडे!

Image
मुख्यमंत्री फडणवीसांकडे पंचक्रोशीच्या विकासासाठी पुन्हा साकडे! रस्ते, आरोग्य, बंधारा आणि एसटी सेवेसह पाच प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची अनंत जाधव यांची मागणी  महाबळेश्वर | प्रतिनिधी महाबळेश्वर तालुक्यातील पंचक्रोशी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी विशेष कार्यकारी अधिकारी (S.E.O.) आणि पत्रकार अनंत शंकर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा सविस्तर निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून विविध प्रश्नांबाबत सातत्याने निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस निर्णय झाला नसल्याची खंत व्यक्त करत, पंचक्रोशीतील नागरिकांना अजूनही रस्ते, आरोग्य, वाहतूक आणि पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. अनंत जाधव यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच अनेक मंत्र्यांचे प्रतिनिधित्व लाभले असतानाही महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम पंचक्रोशी भाग विकासापासून वंचित आहे. शासनाने आता तरी या भागातील ना...

कर्नाटकातील शेकडो शेतकऱ्यांची महाबळेश्वरमध्ये कृष्णामातेस कृतज्ञतेची वंदना विजयपूर–बागलकोटच्या शेतकऱ्यांकडून पंचगंगा मंदिरात गंगापूजा व 'बागीना' अर्पण; २५ वर्षांची परंपरा कायम

Image
कर्नाटकातील शेकडो शेतकऱ्यांची महाबळेश्वरमध्ये कृष्णामातेस कृतज्ञतेची वंदना विजयपूर–बागलकोटच्या शेतकऱ्यांकडून पंचगंगा मंदिरात गंगापूजा व 'बागीना' अर्पण; २५ वर्षांची परंपरा कायम महाबळेश्वर प्रतिनिधी : कृष्णा नदी ही महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील लाखो शेतकरी कुटुंबांची जीवनदायिनी मानली जाते. या पवित्र नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्तर कर्नाटकातील विजयपूर व बागलकोट जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, महिला व भाविकांनी गुरुवारी महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात विशेष गंगापूजा करून कृष्णामातेला 'बागीना' अर्पण केला. कड्डिगर हुण्णिमे (पावसाळ्यातील पारंपरिक सण) निमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्याचे नेतृत्व कर्नाटकचे माजी मंत्री एस. के. बेळ्ळब्बी यांनी केले. पंचगंगा मंदिरातील उद्भव लिंग आणि कृष्णामातेच्या मूर्तीला मंत्रोच्चारात जलाभिषेक करून शास्त्रोक्त विधीने पूजा करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पद्धतीने कृष्णामातेची ओटी भरून तिचा सन्मान केला. यावेळी बोलताना एस. के. बेळ्ळब्बी म्हणाले की, "कृष्णा नदीने लाखो एकर शेतीला ...

महाबळेश्वरमध्ये मतदार यादी पुनरीक्षणासाठी वॉर्ड सभा संपन्न; दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांच्या पडताळणीला वेग

Image
महाबळेश्वरमध्ये मतदार यादी पुनरीक्षणासाठी वॉर्ड सभा संपन्न; दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांच्या पडताळणीला वेग निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेंतर्गत १० प्रभागांतील १६ भागयाद्यांचे वाचन; लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय प्रतिनिधी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग महाबळेश्वर प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) अभियान महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद क्षेत्रात वेगाने सुरू असून, मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत नगरपरिषद हद्दीतील दुबार, मयत, स्थलांतरित आणि गैरहजर मतदारांची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्या २४ जुलै २०२६ रोजीच्या निर्देशानुसार महाबळेश्वर नगरपरिषद क्षेत्रात वॉर्ड सभांचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार २८ व २९ जुलै २०२६ रोजी नगरपरिषद क्षेत्रातील १० प्रभागांमध्ये या सभा पार पडल्या. या वॉर्ड सभांमध्ये नगरपरिषद हद्दीतील १६ भागयाद्यांमधील संभाव्य गैरहजर, दुबार, मय...

महाबळेश्वर–तापोळा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला; प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या अभूतपूर्व एकजुटीने संकटावर मात

Image
तीन दिवसांच्या अथक संघर्षाला यश! महाबळेश्वर–तापोळा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला; प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या अभूतपूर्व एकजुटीने संकटावर मात १०५ गावांची जीवनवाहिनी पुन्हा सुरू; रात्रंदिवस सुरू असलेल्या बचाव आणि दुरुस्ती मोहिमेला यश, पर्यटकांसह स्थानिकांना मोठा दिलासा महाबळेश्वर प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे खचून सलग तीन दिवस बंद असलेला महाबळेश्वर–तापोळा हा १०५ गावांच्या दळणवळणाचा प्रमुख मार्ग अखेर वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या अभूतपूर्व एकजुटीमुळे अशक्य वाटणारे काम अल्पावधीत पूर्ण झाले. या मार्गावर पुन्हा वाहतूक सुरू झाल्याने १०५ गावांतील हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, तर काही भागात रस्ता मोठ्या प्रमाणात खचला. त्यामुळे तापोळा आणि परिसरातील १०५ गावांचा महाबळेश्वरशी संपर्क प...

कोयना धरण ८० टक्के भरले; पावसाचा जोर कायम, आवक-निर्गमनात मोठी तफावत

Image
कोयना धरण ८० टक्के भरले; पावसाचा जोर कायम, आवक-निर्गमनात मोठी तफावत महाबळेश्वर प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यासह कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणात एकूण ८३.९५ टीएमसी (७९.७६ टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा ७८.८३ टीएमसी (७८.७३ टक्के) इतका झाला आहे. त्यामुळे धरण आता ८० टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले असून आगामी काही दिवसांतील पावसावर पुढील जलव्यवस्थापन अवलंबून राहणार आहे. धरणाची पाणीपातळी २१४५ फूट ०७ इंच (६५३.९७४ मीटर) इतकी नोंदविण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत कोयना येथे ४३ मिमी , नवजा येथे ५१ मिमी पावसाची नोंद झाली असून हंगामातील एकूण पाऊस अनुक्रमे २७७४ मिमी आणि ३३३५ मिमी झाला आहे. महाबळेश्वर येथे दैनंदिन पावसाची नोंद उपलब्ध नसली तरी हंगामातील एकूण पर्जन्यमान ३४८५ मिमी इतके झाले आहे. सध्या धरणात १८,१०७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, त्याचे प्रमाण सुमारे १.५६ टीएमसी प्रतिदिन इतके आहे. दुसरीकडे धरणातून केवळ १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग स...

सातारा जिल्हा रुग्णालयात एमआरआय, कॅथलॅब सेवा तातडीने सुरू करा; रिक्त पदभरतीलाही गती द्या – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Image
सातारा जिल्हा रुग्णालयात एमआरआय, कॅथलॅब सेवा तातडीने सुरू करा; रिक्त पदभरतीलाही गती द्या – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा रुग्णालयातील एमआरआय व कॅथलॅब सेवा तातडीने सुरू करण्याबरोबरच आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त रुग्णालये व आरोग्य संस्थांतील विकासकामे, मनुष्यबळाची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा आणि प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय आणि कॅथलॅब सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचना देताना मंत्री ...

कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १६.९६ लाख शेतकऱ्यांना ₹१३,३३६ कोटींचा दिलासा

Image
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १६.९६ लाख शेतकऱ्यांना ₹१३,३३६ कोटींचा दिलासा मुंबई प्रतिनिधी : राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, राज्यातील १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण ₹१३,३३६ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, ही फक्त पहिली यादी असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्यांचे नाव सध्या जाहीर झालेल्या यादीत नाही, त्यांनी कोणतीही चिंता करू नये. सर्व पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने योजनेचा लाभ दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या यादीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील ७.०३ लाख आणि व्यापारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांतील ९.९३ लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने ₹१३,३३६ कोटींची तरतूद केली आहे. पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण तात...

नामांतरापलीकडचा सन्मान!'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' : इतिहासाला अभिवादन, विकासाचीही तितकीच अपेक्षा

Image
नामांतरापलीकडचा सन्मान! 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' : इतिहासाला अभिवादन, विकासाचीही तितकीच अपेक्षा महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि प्रेरणेचे अखंड स्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राज्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू, संस्था आणि प्रकल्पांशी जोडले गेले आहे. आता कोयना धरणाच्या जलाशयाचे अधिकृत नामकरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' असे करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय हा त्याच परंपरेतील एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह टप्पा आहे. हा निर्णय केवळ एका जलाशयाचे नाव बदलण्यापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राच्या इतिहासाला, संस्कृतीला आणि स्वाभिमानाला दिलेला मानाचा मुजरा आहे. कोयना धरण हे महाराष्ट्राच्या विकासाचा कणा मानले जाते. जलविद्युत निर्मिती, सिंचन, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि औद्योगिक प्रगती यामध्ये या प्रकल्पाचे योगदान अमूल्य आहे. सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा प्रकल्प आजही राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला बळकटी देत आहे. अशा महत्त्वाच्या जलाशयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जोडले जाणे ही प्रत्येक मराठी...

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम

Image
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम वाईतील मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप; संस्थेच्या कार्यकर्त्यांचा शहर शिवसेनेकडून गौरव वाई प्रतिनिधी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने वाई येथे सामाजिक बांधिलकी जपणारा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. शहरातील रेव्हीका साहिल अक्षय इन्स्टिट्यूट या मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणिक साहित्य आणि विविध प्रकारचा खाऊ वितरित करण्यात आला. विशेष मुलांसोबत संवाद साधत त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. या प्रसंगी संस्थेचे संचालक, शिक्षक आणि कर्मचारी यांचा त्यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शहर शिवसेना प्रमुख राजाभाऊ गुजर , युवासेना शहर प्रमुख आ...

महाबळेश्वर पालिकेचा मोठा निर्णय!

Image
महाबळेश्वर पालिकेचा मोठा निर्णय! स्वच्छतेचा ₹११.२५ कोटींचा ठेका रद्द; अकार्यक्षमतेवर प्रशासनाचा दणका व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस कंपनीला हटविण्याचा सर्वानुमते निर्णय; पाणीदरवाढीसाठी विशेष सभा, विकासकामांनाही हिरवा कंदील महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या स्वच्छतेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेण्यात आला. घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे दीड वर्षापूर्वी व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलेला ₹११ कोटी २५ लाख १७ हजार ७७५ रुपयांचा स्वच्छतेचा ठेका रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ठेकेदार कंपनीच्या सातत्याने होत असलेल्या अकार्यक्षम कामकाजामुळे शहराच्या स्वच्छतेचा दर्जा खालावल्याची तीव्र नाराजी सभेत व्यक्त करण्यात आली. नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सर्वसाधारण सभेत स्वच्छता सभापती ॲड. संजय जंगम यांनी ठेकेदार कंपनीने करारातील अटींचे प्रभावी पालन न केल्यामुळे शहरातील स्वच्छतेचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे स्पष्ट केले. त...

महाबळेश्वर–तापोळा मार्गासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची अभूतपूर्व एकजूट; रात्रंदिवस प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात१०५ गावांच्या जीवन वाहिनीच्या बचावासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर; अफवांपासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Image
महाबळेश्वर–तापोळा मार्गासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची अभूतपूर्व एकजूट; रात्रंदिवस प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात १०५ गावांच्या जीवनवाहिनीच्या बचावासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर; अफवांपासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन महाबळेश्वर प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे खचलेल्या महाबळेश्वर–तापोळा या १०५ गावांच्या प्रमुख दळणवळणाच्या मार्गासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी दाखविलेली एकजूट हा संपूर्ण तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तहसील प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महाबळेश्वर नगरपालिका, वन विभाग, १०५ गाव नियोजन समितीचे पदाधिकारी आणि अनेक स्वयंसेवक घटनास्थळी रात्रंदिवस कार्यरत असून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तापोळा–महाबळेश्वर हा मार्ग १०५ गावांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. अतिवृष्टीमुळे रस्ता खचल्याने नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि अत्यावश्यक सेवांवर मोठा परिणाम झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनान...

केळघर घाटात भीषण दरड; दरड हटविताना जेसीबी घसरली, सुदैवाने जीवितहानी टळली

Image
केळघर घाटात भीषण दरड; दरड हटविताना जेसीबी घसरली, सुदैवाने जीवितहानी टळली मेढा–महाबळेश्वर मार्गावरील काळाखडक परिसरातील घटना; वाहतूक पूर्णपणे बंद, प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य महाबळेश्वर प्रतिनिधी : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मेढा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील काळाखडक परिसरात रविवारी मोठी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडे आल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घाट मार्ग तात्पुरता बंद केला आहे. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरड हटविण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू करण्यात आले. मात्र, दरड हटविताना एक जेसीबी घसरल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. घाट परिसरात अद्यापही पाऊस सुरू असल्याने डोंगरकडील भागातील माती सैल झाली असून, आणखी दरड कोसळण्याचा...

अतिवृष्टीचा फटका! देवळीतील घरावर दरड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी

Image
अतिवृष्टीचा फटका! देवळीतील घरावर दरड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून, देवळी गावातील रहिवासी अशोक जाधव यांच्या घरावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अशोक जाधव यांच्या घराच्या आजूबाजूची माती खचून मोठी दरड थेट घरावर कोसळली. या दुर्घटनेत घराच्या संरचनेचे मोठे नुकसान झाले असून, कुटुंब भयभीत अवस्थेत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घर राहण्यायोग्य राहिले नसल्याची माहिती मिळाली आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील जमीन सैल झाली असून, आणखी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनीही या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा, नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून आर्थिक मदत द्यावी तसेच सुरक्षित पुनर्वसनाची व्यवस्था करावी,...

महाबळेश्वर पोलिसांची दमदार कामगिरी; ₹५.४७ लाखांचा ऐवज नागरिकांना परतहरविलेले १४ मोबाईल आणि ऑनलाइन फसवणुकीतील ₹२.२५ लाख परत; तांत्रिक तपासातून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ

Image
महाबळेश्वर पोलिसांची दमदार कामगिरी; ₹५.४७ लाखांचा ऐवज नागरिकांना परत हरविलेले १४ मोबाईल आणि ऑनलाइन फसवणुकीतील ₹२.२५ लाख परत; तांत्रिक तपासातून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ महाबळेश्वर, दि. २७ (प्रतिनिधी): महाबळेश्वर पोलीस ठाण्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत नागरिकांच्या हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याबरोबरच ऑनलाइन फसवणुकीतील रक्कमही परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक कौशल्य आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धतीच्या बळावर पोलिसांनी एकूण ₹५ लाख ४७ हजारांचा ऐवज व रक्कम मूळ मालकांच्या ताब्यात देऊन सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरले आहेत. महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर तसेच वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सांळुखे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची जबाबदारी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी प्रभावीपणे सांभाळली....

कोयना जलाशयातील नागरिकांना मोठा दिलासा!तापोळा येथे तराफा (बार्ज) सेवा पुन्हा सुरू; अजित संकपाळ आणि संजय मोरे यांच्या पाठपुराव्याला यश, लाँच सेवेलाही लवकरच हिरवा कंदील अपेक्षित

Image
कोयना जलाशयातील नागरिकांना मोठा दिलासा! तापोळा येथे तराफा (बार्ज) सेवा पुन्हा सुरू; अजित संकपाळ आणि संजय मोरे यांच्या पाठपुराव्याला यश, लाँच सेवेलाही लवकरच हिरवा कंदील अपेक्षित तापोळा | प्रतिनिधी कोयना जलाशय परिसरातील सोळशी, कांदाटी व आसपासच्या गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून तापोळा येथे तराफा (बार्ज) सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ आणि पंचायत समिती महाबळेश्वरचे उपसभापती संजय मोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सेवा पुन्हा कार्यान्वित झाली आहे. गेल्या मे महिन्यापासून बंद असलेली ही सेवा सुरू झाल्याने जलाशय परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, लाँच सेवाही लवकरच सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. कोयना जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मे महिन्यापासून बार्ज सेवा बंद होती. त्यानंतर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे, झाडे रस्त्यावर पडणे, रस्ते वाहून जाणे व दळणवळण खंडित होण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने जलाशय परिसरातील नागरिकांना मोठ्या अडच...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!