Posts

Showing posts from March, 2026

“कामही दिसू द्या, केवळ घोषणा नकोत”; अपेक्षांच्या उंबरठ्यावर महाबळेश्वर पंचायत समिती

Image
“कामही दिसू द्या, केवळ घोषणा नकोत”; अपेक्षांच्या उंबरठ्यावर महाबळेश्वर पंचायत समिती ✍️जितेंद्र कारंडे , प्रतापगड प्रतिनिधी :  महाबळेश्वर तालुक्यात सत्तांतरानंतर नवे नेतृत्व सत्तेवर आले आणि त्याच वेळी जनतेच्या अपेक्षांचाही स्तर उंचावला. काही ठिकाणी सुरुवातीचे हालचाली, बैठका आणि नियोजनाची गती दिसत असली, तरी आता खऱ्या अर्थाने जमिनीवर काम दिसण्याची वेळ आली आहे. “घोषणा चांगल्या आहेत, पण त्याची फळे गावात दिसली पाहिजेत,” अशी थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया नागरिक देताना दिसत आहेत. तालुक्याची रचना पाहता आव्हाने नक्कीच मोठी आहेत. ७९ ग्रामपंचायती, डोंगर-दऱ्यांमध्ये पसरलेल्या वाड्या-वस्त्या, दुर्गम भागातील संपर्काचा अभाव — या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर काम सोपे नाही, हे मान्य करावेच लागेल. विशेषतः कोयना खोरे आणि कांदटी खोरे भागातील परिस्थिती आजही आव्हानात्मक आहे. मात्र, या कठीण परिस्थितीतच नेतृत्वाची खरी ओळख घडते, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ गावे दत्तक घेण्याची घोषणा केल्याने तालुक्याला एक मोठी संधी मिळाली आहे. ही घोषणा केवळ...

हर हर महादेव’च्या जयघोषात शिखर शिंगणापूर यात्रा रंगली; मुंगी घाटातून भाविकांचा थरारक प्रवास

Image
‘हर हर महादेव’च्या जयघोषात शिखर शिंगणापूर यात्रा रंगली; मुंगी घाटातून भाविकांचा थरारक प्रवास सातारा प्रतिनिधी :  शिखर शिंगणापूर येथील वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस यंदा अभूतपूर्व उत्साह, भक्तिभाव आणि जल्लोषात पार पडला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्री पहाटेच्या काकड आरतीपासूनच दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. “हर हर महादेव”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता, तर वातावरणात भक्तीची एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मुख्य दिवसानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि अभिषेकांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी लांबच लांब रांगा लावत संयमाने व श्रद्धेने देवदर्शन घेतले. अनेक भाविकांनी नवस फेडण्यासाठी विशेष पूजाही केली. स्थानिकांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांमुळे शिंगणापूर परिसर गजबजून गेला होता. व्यापारी, विक्रेते आणि स्थानिकांसाठीही हा दिवस आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. यात्रेचे मुख्य आकर्षण ठरला तो मुंगी घाट. डोंगररांगांमधून नागमोडी वळणांनी जाणारा हा घाट भाविकांसाठी नेहमीच थर...

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून २४ शेळ्या ठार, मेंढपाळ गंभीर जखमी

Image
साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज कोसळून २४ शेळ्या ठार, मेंढपाळ गंभीर जखमी सातारा प्रतिनिधी :  सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत धुमाकूळ घातला असून, वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण २४ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. खंडाळा तालुक्यात ८ शेळ्या ठार झाल्या, तर वाई तालुक्यातील आसले येथे १६ शेळ्यांचा मृत्यू झाला असून एक मेंढपाळ गंभीर जखमी झाला आहे. या घटनांमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावातील सोलाडी शिवारात शेतकरी अमोल गोपाळ धायगुडे यांच्या मालकीच्या आठ शेळ्यांचा वीज पडून मृत्यू झाला, तर एक मेंढी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुसरी घटना वाई तालुक्यातील आसले गावात घडली. सोमवारी दुपारी गडगडाटासह गारांसह मुसळधार पावसाची सुरुवात झाली असताना, सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास गावाजवळील पाण्याच्या टाकीजवळ मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग पिसाळ (वय ५०) हे शेळ्या चारत असताना अचानक वीज कोसळली. ...

नवेनगर येथे रंगला ‘बाल आनंद मेळावा’; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला उजाळा

Image
नवेनगर येथे रंगला ‘बाल आनंद मेळावा’; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला उजाळा प्रतापगड प्रतिनिधी :  महाबळेश्वर तालुक्यातील पारसोंड व शिरवली केंद्रातील शाळांचा संयुक्त ‘बाल आनंद मेळावा’ जिल्हा परिषद शाळा नवेनगर येथे उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय केळगणे यांच्या हस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री. रमेश गंबरे , केंद्रप्रमुख श्री. विनायक पवार , माजी सरपंच श्री. सखाराम ढेबे , श्री. अनिल मोरे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विकास मोरे , अध्यक्षा सौ. नंदिनी सावंत यांच्यासह पारसोंड-शिरवली केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षक, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा परिषद शाळा कुंभरोशीच्या विद्य...

तासवडे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; आगीमुळे परिसर हादरला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Image
तासवडे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; आगीमुळे परिसर हादरला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सातारा प्रतिनिधी :  सातारा जिल्ह्यातील तासवडे एमआयडीसी परिसरात सोमवारी (दि. ३० मार्च २०२६) सकाळी सुमारे साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन मोठी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना एसकेएस फाईन केम (SKS Fine Chem) या कंपनीच्या प्लॉट क्रमांक बी-१ (४७) येथे घडली. प्राथमिक माहितीनुसार, “एम्ब्रोजिल बेस” नावाच्या रसायनाचे बॅरल्स अचानक फुटल्याने हा स्फोट झाला. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि काळ्या धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरले. या धुरामुळे एमआयडीसीसह आसपासच्या परिसरात काही काळ दाट धुक्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. स्फोटानंतरही सकाळी दहा वाजेपर्यंत अधूनमधून छोटे-मोठे स्फोट होत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे बचावकार्याला अडथळे निर्माण झाले. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळव...

राज्यात शिक्षणक्रांतीचा नवा टप्पा; ४०५ शाळा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून विकसित होणार

Image
राज्यात शिक्षणक्रांतीचा नवा टप्पा; ४०५ शाळा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून विकसित होणार मुंबई प्रतिनिधी :  राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यातील तब्बल ४०५ शासकीय शाळांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ या दूरदृष्टीच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरी भागाप्रमाणे दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा मिळाव्यात, हा या योजनेमागील मुख्य हेतू आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात निवडलेल्या ४०५ शाळांमध्ये समूह साधन केंद्र शाळा, पीएम श्री शाळा आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील ४७८ शाळांच्या विकासाचे काम अंतिम...

अंबवडेचा ‘वनाश्रम’ ठरला राज्यासाठी आदर्श; वृक्ष पुनर्वसनाचा पहिलाच यशस्वी प्रयोग

Image
अंबवडेचा ‘वनाश्रम’ ठरला राज्यासाठी आदर्श; वृक्ष पुनर्वसनाचा पहिलाच यशस्वी प्रयोग ✍️विजय जाधव, सातारा प्रतिनिधी :  विकासकामांच्या नावाखाली झाडांची तोड ही सर्वत्र पाहायला मिळते, मात्र कोरेगाव तालुक्यातील अंबवडे (संमत वाघोली) येथे याला एक सकारात्मक पर्याय उभा राहिला आहे. येथील ग्रामस्थ, प्रशासन आणि विविध यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आलेला ‘वनाश्रम’ हा प्रकल्प सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत असून वृक्षांचे एकत्रित पुनर्वसन करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरत आहे. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य वृक्ष पुनर्रोपण कार्यक्रमात या उपक्रमाचा गौरव करण्यात आला. यावेळी सह्याद्री देवराई फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपस्थित राहून या प्रयोगाचे कौतुक केले. “पुनर्वसित गावांचे पुनर्वसन आपण पाहतो, पण झाडांचे एकत्रित पुनर्वसन करून त्यांचा ‘वनाश्रम’ उभा राहिलेला हा पहिलाच अनुभव आहे. झाडांना नवी पालवी फुटत असून भविष्यात हा परिसर हिरवागार होऊन पुढील पिढ्यांना आधार देईल,” असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला ज...

१०५ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्वराज्य फाउंडेशन’चा आदर्श उपक्रम; शिक्षण, आरोग्य, शेती व सामाजिक परिवर्तनाचा बहुआयामी ध्यास

Image
१०५ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्वराज्य फाउंडेशन’चा आदर्श उपक्रम; शिक्षण, आरोग्य, शेती व सामाजिक परिवर्तनाचा बहुआयामी ध्यास प्रतापगड प्रतिनिधी :  महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना नदीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर तसेच अतिदुर्गम डोंगररांगांमध्ये वसलेल्या जावली व महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गावांच्या विकासाचा ध्यास घेत सन २०२१ मध्ये स्थापन झालेल्या ‘स्वराज्य फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेने अल्पावधीतच समाजकार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावत ग्रामीण भागात आशेचा किरण निर्माण केला आहे. निस्वार्थ भावनेने प्रेरित सेवाप्रेमी तरुणांच्या एकत्रित विचारातून उभी राहिलेली ही संस्था केवळ मदतपुरती मर्यादित न राहता समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व्यापक दृष्टीकोनातून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक असमतोल दूर करून प्रत्येक कुटुंब सक्षम व स्वावलंबी व्हावे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. समाजातील गरीब, वंचित व दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेसाठी छोटे तलाव, शेततळी व बंधारे उभारून शेतीस पूरक वातावरण निर्माण करणे, तसे...

महाबळेश्वर पंचायत समितीची पहिलीच सभा ठरली दिशादर्शक; विकासकामांचा सखोल आढावा, जनहिताला प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार

Image
महाबळेश्वर पंचायत समितीची पहिलीच सभा ठरली दिशादर्शक; विकासकामांचा सखोल आढावा, जनहिताला प्राधान्य देण्याचा ठाम निर्धार प्रतापगड प्रतिनिधी :  पंचायत समिती महाबळेश्वरची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६ रोजी कै. एम. आर. भिलारे सभागृहात उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. नवनिर्वाचित सभापती मा. सौ. शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिलीच सभा असल्याने सर्वांचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. उपसभापती मा. श्री. संजय मोरे, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. सभेच्या प्रारंभीच नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांच्या बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. पंचायत समिती सदस्य मा. सौ. वंदना भिलारे यांनी हा ठराव मांडला असून मा. श्री. संजय विठ्ठल शेलार यांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात ठराव एकमताने मंजूर करत नव्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. यानंतर विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना विकासकामांच्या गतीवर विशेष भर देण्यात आला. बांधकाम...

तळदेव–तापोळा परिसरात बीएसएनएल सेवा कोलमडली; “रिचार्ज करूनही उपयोग नाही” म्हणत नागरिकांचा संताप उफाळला

Image
तळदेव–तापोळा परिसरात बीएसएनएल सेवा कोलमडली; “रिचार्ज करूनही उपयोग नाही” म्हणत नागरिकांचा संताप उफाळला प्रतापगड प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव, तापोळा आणि परिसरातील ग्रामीण भागात Bharat Sanchar Nigam Limited (बीएसएनएल) ची मोबाईल नेटवर्क सेवा गेल्या दीड महिन्यांपासून पूर्णपणे कोलमडली असून नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी नेटवर्क पूर्णपणे ठप्प असून जिथे सिग्नल मिळतो, तिथेही तो अत्यंत कमजोर असल्याने फोन कॉल, इंटरनेट सेवा आणि डिजिटल व्यवहार जवळपास अशक्य झाले आहेत. या भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवनच विस्कळीत झाले आहे. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठा अडथळा निर्माण झाला असून, परीक्षा तयारी, नोट्स डाउनलोड करणे, ऑनलाइन क्लासेस अटेंड करणे यांसारख्या गोष्टींमध्ये गंभीर अडचणी येत आहेत. तसेच शासकीय योजना, बँकिंग व्यवहार आणि विविध डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांनाही याचा मोठा फटका बसत आहे. तापोळा हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा भाग असल्यामुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र नेटवर्क नसल्यामुळे ...

धुळदेवजवळ भीषण अपघात; रखडलेल्या रस्त्याचा बळी — दोन ठार, तीन गंभीर; आठ वर्षांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप

Image
धुळदेवजवळ भीषण अपघात; रखडलेल्या रस्त्याचा बळी — दोन ठार, तीन गंभीर; आठ वर्षांच्या दुर्लक्षावर ग्रामस्थांचा संताप म्हसवड प्रतिनिधी – माण तालुक्यातील म्हसवडजवळ धुळदेव गावाच्या हद्दीत आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रखडलेल्या रस्ते कामामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील कोडोली येथील निकम कुटुंब देवदर्शनासाठी पंढरपूरकडे आल्टो कारने निघाले होते. सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसवडहून पुढे जात असताना धुळदेव गावाजवळील रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने चालकाचा अंदाज चुकला. रस्त्यावर मोठे खड्डे आणि उखडलेला भाग अचानक समोर आल्याने चालकाने जोरात ब्रेक लावला. त्यामुळे कारने तीन ते चार पलट्या घेतल्या आणि हा भीषण अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच धुळदेव ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग...

रमाईनगरमध्ये सम्राट अशोक जयंती उत्साहात; समता, अहिंसा आणि धम्मविचारांचा जागर

Image
रमाईनगरमध्ये सम्राट अशोक जयंती उत्साहात; समता, अहिंसा आणि धम्मविचारांचा जागर महाबळेश्वर प्रतिनिधी :  भारतीय बौद्ध महासभा, महाबळेश्वर तालुका यांच्या वतीने रमाईनगर देवळी (ता. महाबळेश्वर) येथे सम्राट अशोक यांची २३३०वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव होते. कार्यक्रमाची सुरुवात सम्राट अशोक तसेच इतर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित उपासक-उपासिकांनी बौद्ध धम्माच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. या वेळी शांतता, बंधुभाव आणि समतेचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी जिल्हा संस्कार सचिव दिलीप यादव आणि तालुकाध्यक्ष नितीन गायकवाड यांनी सम्राट अशोक यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, युद्धाच्या मार्गावरून धम्माच्या मार्गावर वळलेले सम्राट अशोक हे जगासाठी आदर्श ठरले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अहिंसा...

स्वदेस फाऊंडेशनकडून देवळे गावाची “स्वप्नातील गाव” म्हणून निवड; सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा

Image
स्वदेस फाऊंडेशनकडून देवळे गावाची “स्वप्नातील गाव” म्हणून निवड; सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा ✍️प्रकाश कदम, पोलादपूर  प्रतिनिधी  :  पोलादपूर तालुक्यातील देवळे गावाची “स्वप्नातील गाव” म्हणून स्वदेस फाऊंडेशनतर्फे निवड करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमाअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार असून, ग्रामस्थांच्या सहभागातून आदर्श गाव उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. स्वदेस फाऊंडेशनचे महाप्रबंधक तुषार इनामदार, वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार, विशाल वरुटे, व्यवस्थापक दीपेश जाधव आदी मान्यवरांनी देवळे गावाला भेट देऊन ग्रामविकास समितीला “स्वप्नातील गाव” निवडीचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमावेळी स्वदेस फाऊंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार यांच्या हस्ते “स्वप्नातील गाव” या फलकाचे अनावरण करण्यात आले. ग्रामविकास समितीचे अध्यक्ष गणेश केसरकर, सचिव चंद्रकला केसरकर तसेच शंकर केसरकर, सुगंधा...

‘पुस्तकांचे गाव’ भिलारमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा; दुपारनंतर उपकेंद्र बंद, नागरिक त्रस्त

Image
‘पुस्तकांचे गाव’ भिलारमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा; दुपारनंतर उपकेंद्र बंद, नागरिक त्रस्त पाचगणी प्रतिनिधी:  राज्यात ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विशेष ओळख निर्माण केलेल्या भिलार येथे आरोग्य सेवेची अत्यंत दयनीय अवस्था समोर येत असून पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे भिलार उपकेंद्र दुपारनंतर बंद राहत असल्याने रुग्णांची मोठी परवड होत आहे. सकाळच्या वेळेत काही प्रमाणात सेवा सुरू असली तरी दुपारनंतर उपकेंद्राला कुलूप लागलेले दिसत असल्याने नागरिकांना उपचारासाठी भटकंती करावी लागत आहे. भिलार गावासह कासबंड, उंबरी, दानवली, धामुणेवाडी, घोटघर, अखेगणी आणि भोसे या परिसरातील नागरिक या उपकेंद्रावर प्राथमिक आरोग्य सेवांसाठी अवलंबून आहेत. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण तपासणी, औषधोपचार आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी येथे येत असतात. मात्र दुपारनंतर उपकेंद्र बंद असल्यामुळे अनेक रुग्णांना निराश होऊन परत जावे लागत आहे. काहींना तातडीच्या उपचारासाठी ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचगणी येथे जावे लागत असून त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा ताण सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा...

महाबळेश्वर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आनंदयात्रा; किंगबेरी भिलार येथे सहलीत ९० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Image
महाबळेश्वर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आनंदयात्रा; किंगबेरी भिलार येथे सहलीत ९० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाबळेश्वर प्रतिनिधी :  शिक्षण विभाग, पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या वतीने दिनांक २४ मार्च २०२६ रोजी तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किंगबेरी, भिलार येथे विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत तालुक्यातील विविध शाळांमधील एकूण ९० दिव्यांग विद्यार्थी तसेच त्यांच्यासोबत शिक्षक व समन्वयक मिळून एकूण ११३ जण सहभागी झाले होते. दिवसभर विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटत विविध उपक्रमांत सहभागी होत आनंदी आणि उत्साही वातावरण अनुभवले. महाबळेश्वर तालुक्यातील १२ केंद्रांमधून विविध शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांना एकत्र आणून ही सहल आयोजित करण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच सहल ठरल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. निसर्गरम्य किंगबेरी परिसरात विद्यार्थ्यांनी मुक्तपणे खेळ, गाणी, संवाद आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेतला. एकमेकांशी ओळखी वाढवत त्यांनी सहकार्य, मैत्री आणि एकात्मतेचा सुंदर अनु...

अफवांना बळी पडू नका; साताऱ्यात इंधनाचा पुरेसा साठा – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

Image
अफवांना बळी पडू नका; साताऱ्यात इंधनाचा पुरेसा साठा – प्रशासनाचे नागरिकांना आवाहन सातारा प्रतिनिधी :  आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवा पसरवून काही घटकांकडून साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, सातारा जिल्हा प्रशासनाने नागरिकांना स्पष्टपणे आवाहन केले आहे की, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे शासनस्तरावरून कळविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये प्रशासन इंधन पुरवठ्यावर सतत लक्ष ठेवून असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात BPCL आणि HPCL या तेल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर यांनी सातारा जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याची माहिती दिली आहे. काही पेट्रोल पंपांवर ‘अॅडव्हान्स पेमेंट’ प्रणालीमुळे तात्पुरता पुरवठा विस्कळीत झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून त्याचा इंधन टंचाईशी कोणताही संबंध नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी अ...

संघर्षातून यशाच्या शिखराकडे; महाबळेश्वरात कर्तृत्ववान महिलांचा ‘वूमन एक्सलेन्स अवॉर्ड’ने गौरव

Image
 संघर्षातून यशाच्या शिखराकडे; महाबळेश्वरात कर्तृत्ववान महिलांचा ‘वूमन एक्सलेन्स अवॉर्ड’ने गौरव महाबळेश्वर प्रतिनिधी :  जीवनातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जात, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या आणि इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा महाबळेश्वर येथे सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. भारत बियाँड बॉण्डरिज फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात ‘वूमन एक्सलेन्स अवॉर्ड’ प्रदान करून विविध क्षेत्रातील महिलांच्या कार्याची दखल घेण्यात आली. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. भाग्यश्री मोहन शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिवानीताई कळसकर, डॉ. अनुराधा दिवेकर, नीलम टांगारी तसेच स्मिता रांजणे यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गौरवप्राप्त महिलांच्या कार्याचे मनापासून कौतुक करत त्यांच्या संघर्षमय प्रवासाला सलाम केला. समाजातील विविध क...

१७.४० कोटींची थकबाकी; महाबळेश्वरचा पाणीपुरवठा खंडित, नागरिक व पर्यटक दोघेही त्रस्त

Image
१७.४० कोटींची थकबाकी; महाबळेश्वरचा पाणीपुरवठा खंडित, नागरिक व पर्यटक दोघेही त्रस्त महाबळेश्वर | प्रतिनिधी पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर शहरावर सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवले असून, नगरपालिकेच्या आर्थिक निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. महाबळेश्वर नगरपालिकेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे तब्बल १७ कोटी ४० लाख रुपयांची पाणी बिलाची थकबाकी जमा झाल्याने प्राधिकरणाने शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून नगरपालिकेकडून पाणीपुरवठ्याचे बिल नियमितपणे भरले गेले नव्हते. प्राधिकरणाने वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरल्याने अखेर पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अचानक घडामोडीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पाणीपुरवठा बंद झाल्याने शहरातील अनेक भागांमध्ये नळ कोरडे पडले आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यास...

इराण–इस्राईल तणावाचा परिणाम? साताऱ्यात अफवांची धुमाकूळ; पेट्रोल मुबलक असल्याची प्रशासनाची खात्री

Image
इराण–इस्राईल तणावाचा परिणाम? साताऱ्यात अफवांची धुमाकूळ; पेट्रोल मुबलक असल्याची प्रशासनाची खात्री सातारा | प्रतिनिधी मध्यपूर्वेत इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असताना, त्याचे पडसाद सातारा शहरात अफवांच्या रूपाने उमटताना दिसत आहेत. “पेट्रोल लवकरच संपणार” अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हारमुज जलडमरू परिसरात काही देशांची तेलवाहू जहाजे अडकल्याच्या बातम्या समोर आल्याने जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र, या घडामोडींचा भारतातील तात्काळ इंधन पुरवठ्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही, असे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे. देशात तसेच सातारा जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. सातारा शहरातील सर्व पेट्रोल पंपां...

हातरेवाडीत हरिनामाचा गजर; ज्ञानेश्वरी पारायण व हनुमान जन्मोत्सवाने परिसर भक्तिमय

Image
हातरेवाडीत हरिनामाचा गजर; ज्ञानेश्वरी पारायण व हनुमान जन्मोत्सवाने परिसर भक्तिमय ✍️संतोष मालुसरे, तापोळा प्रतिनिधी – जावली तालुक्यातील मौजे हातरेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व हनुमान जन्मोत्सवाचा भव्य आणि भक्तिमय सोहळा २९ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ग्रामस्थ मंडळ हातरेवाडी यांच्या पुढाकाराने आणि श्री पांडुरंगाच्या कृपेने साकारत असलेल्या या सप्ताहासाठी गावासह परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सप्ताहाचे मार्गदर्शन ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे (निपाणी) यांच्या नेतृत्वाखाली होत असून, ह.भ.प. आनंद महाराज कदम (आपटी), ह.भ.प. कृष्णा महाराज शिंदे (आळंदी), ह.भ.प. दीपक महाराज बनकर (आळंदी) यांच्यासह अनेक नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार व भजनकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या ओजस्वी वाणीतून होणारे प्रवचन आणि कीर्तन यामुळे भक्तांना आध्यात्मिक समाधान लाभणार आहे. सप्ताहादरम्यान दररो...

महाबळेश्वर न्यायालयाचा मोठा निर्णय : ‘अपहरण’ प्रकरणात अनिल देसाई व संदीप मांडवे यांना जामीन; बापूसाहेब शिंदेही न्यायालयात हजर, पोलिसांच्या कारभारावर तीव्र ताशेरे

Image
महाबळेश्वर न्यायालयाचा मोठा निर्णय : ‘अपहरण’ प्रकरणात अनिल देसाई व संदीप मांडवे यांना जामीन; बापूसाहेब शिंदेही न्यायालयात हजर, पोलिसांच्या कारभारावर तीव्र ताशेरे महाबळेश्वर प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या ‘अपहरण’ प्रकरणात आज महाबळेश्वर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना जामीन मंजूर केला. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढल्याने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर काही सदस्यांचे अपहरण झाल्याचा आरोप पुढे आला होता. या आरोपाच्या आधारे अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यासह काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या घटनेने सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधानसभेतही उमटले होते, त्यामुळे ह...

अस्कॅड अंतर्गत महाबळेश्वरमध्ये पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीर; आधुनिक तंत्रज्ञानामुळे पशुपालकांना होणार मोठा फायदा

Image
अस्कॅड अंतर्गत महाबळेश्वरमध्ये पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीर; आधुनिक तंत्रज्ञानामुळे पशुपालकांना होणार मोठा फायदा महाबळेश्वर प्रतिनिधी :  पंचायत समिती महाबळेश्वर येथे दि. २४ मार्च २०२६ रोजी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘अस्कॅड’ (ASCAD) योजनेअंतर्गत आयोजित एकदिवसीय कर्मचारी प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. पशुसंवर्धन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, रोगनियंत्रण उपाययोजना आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध भागातून आलेल्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या प्रशिक्षण शिबिरामध्ये पशुवैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करताना जनावरांमध्ये आढळणारे विविध संसर्गजन्य आजार, त्यांची लक्षणे आणि तातडीने करावयाचे उपचार याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच योग्य वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण केल्यास जनावरांचे मृत्यूदर मोठ्या प्रमाणात कमी करता येतो, यावरही त्यांनी विशेष भर दिला. याशिवाय पशुपालकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययो...

महाबळेश्वर तालुक्याची घरकुल योजनांत झेप; कातकरी समाजापासून सर्वसामान्यांपर्यंत ‘स्वप्नातील घर’ साकार

Image
महाबळेश्वर तालुक्याची घरकुल योजनांत झेप; कातकरी समाजापासून सर्वसामान्यांपर्यंत ‘स्वप्नातील घर’ साकार महाबळेश्वर प्रतिनिधी :  सातारा जिल्ह्यात घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असतानाच महाबळेश्वर तालुक्याने या कामगिरीत विशेष ठसा उमटवला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात तालुक्याने उल्लेखनीय यश मिळवले असून, प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे अनेक कुटुंबांचे ‘स्वतःच्या घराचे स्वप्न’ साकार होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा क्रमांक एकमध्ये उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर टप्पा क्रमांक दोनमध्येही सातारा जिल्ह्याने भरीव प्रगती साधली आहे. एकूण ८७४ घरकुलांच्या उद्दिष्टापैकी ६२४ घरकुले पूर्ण झाली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. या सर्व प्रक्रियेत महाबळेश्वर तालुक्याचा वाटा लक्षणीय राहिला आहे. विशेषतः कातकरी समाजासाठी राबविण्यात आलेल्या पीएम जनमन घरकुल आवास योजनेत महाबळेश्वर तालुक्याने शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करत आदर्श निर्माण केला आहे. तालुक्याला मिळालेल्या ४५ घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत स...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!