Posts

Showing posts from August, 2025

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दरे गाव भेटीदरम्यान महाबळेश्वर तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पदाधिकाऱ्यांची विकास कामांवर चर्चा

Image
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वागत करताना शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महाबळेश्वर प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आपल्या मूळ गावी दरे (ता. महाबळेश्वर) येथे दाखल झाले होते. या आगमनादरम्यान महाबळेश्वर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांनी खासदारांची भेट घेऊन तालुक्यातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत संभाजी भिलारे, गणेश उतेकर, श्री विठ्ठल शिंदे मामा, श्री विशाल संकपाळ (उपजिल्हाप्रमुख), श्री आनंद धनावडे (चेअरमन – शिवसागर बोट क्लब), श्री मंगेश संकपाळ (सरपंच – लाखवड), श्री लक्ष्मण शिंदे (सरपंच – कुरोशी), शंकर भोजे (रामेघर), श्री राम संकपाळ (सरपंच – वेळापूर), आवेश ढेबे (सरपंच), रमेश धनावडे (सरपंच – तापोळा), किशोर जंगम (तळदेव), चंदर कदम (विवार), राजू कदम (सोनाट), प्रकाश जाधव (सौंदरी), किसन शिंदे (सौंदरी), चंद्रकांत मोरे (गोगवे), भीवराम मोरे (वारसोली), किरण शिंदे, रणजीत शिंदे (सरपंच – दरे), बबन संकपाळ (सरपंच –...

राज ठाकरेंच्या टीकेवर शिंदेंचे प्रत्युत्तर; "पूर्ण माहिती घेऊनच बोलायला हवे होते"

Image
प्रतापगड वार्ताहर: मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा तापलेला आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मात्र त्यावर आता शिंदेंनी थेट प्रत्युत्तर देत राज ठाकरेंनी ‘पूर्ण माहिती न घेता बोलणे योग्य नाही’, असा सल्ला दिला आहे. सातारा येथे पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज ठाकरे यांनी आधी संपूर्ण माहिती घ्यायला हवी होती. मराठा समाजाला आम्ही १० टक्के आरक्षण दिले आहे. खरं तर आरक्षण का गेले, हा प्रश्न त्यांनी त्यावेळच्या सरकारला विचारायला हवा होता. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हायकोर्टात हे आरक्षण आम्ही टिकवले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयात ते का टिकले नाही, याची उत्तरे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवी होती.” तसेच शिंदे पुढे म्हणाले, “मी हे बोलतोय ते काही लोकांना माहिती व्हावं म्हणूनच बोलतोय. आम्ही न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन करून अनेक पुरावे शोधले. १९६७ पूर्वीच्या असंख्य नोंदी का...

मराठा आरक्षणावर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा

Image
मुंबई : आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (३१ ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जरांगे यांच्या मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. ही बैठक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मंत्री प्रत्यक्ष उपस्थित होते. तर काही मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले. बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज संपन्न झाली. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. त्यांच्या मागण्यांच्या अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये, तसेच प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचे मार्गदर्शन...

ओबीसीतूनच आरक्षण घेणार; उद्यापासून पाणीही बंद – मनोज जरांगे पाटील

Image
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले की, “ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि उद्यापासून पाणीही बंद करणार.” पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सरकारवर तीव्र टीका केली. “मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला. शांततेत आंदोलनाचे आवाहन जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, उद्यापासून ते कडक आमरण उपोषण सुरू करणार असून, यावेळी मराठा समाजातील कोणत्याही युवकाने दगडफेक किंवा हिंसक कृती करू नये. “आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शांततेचा मार्ग सोडायचा नाही. समाजाला खाली मान घालावी लागेल, असे कुठलेही पाऊल उचलले जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी-रविवारी मुंबईत मोठी गर्दी अपेक्षित आंदोलनाला अधिक वेग देण्यासाठी त्यांनी जाहीर केले की येत्या शनिवारी–रविवारी महाराष्ट्रातील एकही मराठा घरात थांबणार नाही. “मुंबईकडे एवढा जनसागर येईल की, १०० ते २०० क...

मराठा आरक्षणावरून पवार विरुद्ध पवार – अजित पवारांचा शरद पवारांना थेट टोला

Image
मुंबई प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे देतो आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्रित झाले आहे. आरक्षणाचा प्रश्न केवळ समाजाच्या भवितव्याशी निगडित नसून तो आता राजकीय आरोप–प्रत्यारोपांचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे या वेळी हा वाद पवार घराण्याच्या दोन गटांमध्ये थेट उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर येथे बोलताना मोठे विधान केले. त्यांनी तामिळनाडूचे उदाहरण देत म्हटले – “तामिळनाडूमध्ये ७२ टक्क्यांपर्यंत आरक्षण लागू शकते, तर महाराष्ट्रात का नाही? जर खरोखरच मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल, तर आवश्यकतेनुसार संविधानात दुरुस्ती करण्यास मागेपुढे पाहू नये.” या विधानातून त्यांनी राज्य सरकारवर थेट दबाव आणला. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावनांना हात घातला आणि सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. शरद पवारांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तातडीने प्रतिक...

प्रिया मराठे यांचं निधन – मराठी व हिंदी मालिकांची लोकप्रिय अभिनेत्री कर्करोगाशी झुंज देत कायमची शांत

Image
मुंबई : मराठी तसेच हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे (वय 38) यांचं आज, 31 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे साडेचार वाजता मीरारोड येथील निवासस्थानी निधन झालं. गेल्या वर्षभर त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. उपचार सुरू असतानाही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या शरीराने औषधांना प्रतिसाद देणं थांबवलं आणि अखेर त्यांनी प्राणज्योत मालवली. प्रिया मराठे यांनी मराठी मालिकांमध्ये ‘तू तिथे मी’ , ‘तुझेच मी गीत गात आहे’ आणि ‘चार दिवस सासूचे’ यामधून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला. हिंदी टीव्ही प्रेक्षकांसाठी त्यांनी ‘पवित्र रिश्ता’ (वर्षा), ‘कसम से’ (विद्या बाली), ‘कॉमेडी सर्कस’ , ‘बड़े अच्छे लगते हैं’ आणि ‘साथ निभाना साथिया’ अशा लोकप्रिय मालिकांमधून उल्लेखनीय भूमिका साकारल्या. त्यांचा अभिनयाचा प्रवास तितकाच विविधांगी व प्रभावी राहिला. प्रियाचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता मीरारोड येथील हिंदू स्मशानभूमीत पार पडणार असून, नातेवाईक, मित्रपरिवार व कलाविश्वातील मान्यवर त्यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच मराठी–हिंदी मनोरंजन क्षेत्र...

दानशूर व्यक्तिमत्त्व मा. श्री. विजय धनावडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप भेट – शैक्षणिक सहलीसाठीही स्वखर्चाने पुढाकार

Image
 गवडी गावचा शैक्षणिक तेजोमय उपक्रम गवडी (प्रतिनिधी) : गवडी तालुका जावली येथील दानशूर व्यक्तिमत्व व दूरदृष्टी असलेले युवा उद्योजक मा. श्री. विजय यशवंत धनावडे यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत आपल्या गावातील शैक्षणिक क्षेत्रात मोठा हातभार लावला आहे. गवडी शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप भेट देऊन त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाचे नवे दालन खुले केले. धनावडे यांच्या या उदात्त कार्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची गोडी लागेलच, शिवाय त्यांच्या शैक्षणिक प्रवासात नवे संधीचे मार्ग मोकळे होतील. गावातील ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने त्यांच्या या पावलाचे मनःपूर्वक स्वागत करत विशेष आभार मानले. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी श्री. धनावडे यांनी रायगड किल्ल्याची शैक्षणिक सहल स्वखर्चाने आयोजित करण्याची तयारी दर्शविली. इतिहासाची प्रत्यक्ष ओळख आणि प्रेरणा देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास गवडी गावचे सरपंच श्री. राजाराम खुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अंकु...

राजपुरी गणेशोत्सव मंडळाला मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट

Image
पाचगणी प्रतिनिधी : राजपुरी (ता. महाबळेश्वर) येथे गणेशोत्सवाचा उत्साह उंचावला असताना कार्तिकस्वामी कला क्रीडा गणेशोत्सव मंडळा ला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांनी विशेष भेट दिली. मंडळात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले व आरती करून गावकऱ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, “गणरायाच्या कृपेने सर्वांच्या मनातील मंगल इच्छा पूर्ण होवोत आणि समाजात ऐक्य, सौहार्द व प्रगतीचा संदेश मिळो,” अशी प्रार्थना त्यांनी गणराया चरणी केली. त्यांच्या उपस्थितीमुळे गावातील वातावरण भक्तिभावाने आणि उत्साहाने अधिक रंगले. या भेटीला स्थानिक मान्यवरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजेंद्र शेठ राजपुरे, प्रवीण भिलारे, रमेश चोरमले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांचे स्वागत करून त्यांना मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्तिकस्वामी कला क्रीडा गणेशोत्सव मंडळ हे स्थानिक पातळीवर सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रम राबविण्यात अग्रेसर मानले जाते. दरवर्षी गणेशोत्...

महाबळेश्वर नगरपरिषदेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन

Image
महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेतर्फे यंदाही “पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदाचे हे दुसरे वर्ष असून, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशभक्तांसाठी काही महत्त्वपूर्ण नियम घालण्यात आले आहेत. यात शाडूमातीची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. सजावटीसाठी थर्माकॉल, प्लास्टिक यांसारख्या प्रदूषणकारक वस्तूंचा वापर पूर्णपणे बंदीस्त असेल. यासोबतच, उत्सव काळात फटाके टाळण्याचे आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नगरपरिषदेकडून कचरा व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. स्पर्धकांनी घरातील ओला, सुका, घरगुती घातक व बायोमेडिकल कचरा या चार प्रकारांत वर्गीकरण करून नगरपालिकेच्या घंटागाडीत जमा करणे अपेक्षित आहे. या नियम...

देवळे गावातील श्री गणेश मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम – लर्निंग लायसन्स कॅम्प व रक्तदान शिबिर समाजापुढे आदर्श

Image
पोलादपूर प्रतिनिधी ( प्रकाश कदम) पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे देवळे गाव हे केवळ कृषी पंढरी म्हणूनच नव्हे तर सांस्कृतिक परंपरा जपणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. “एक गाव – एक गणपती” ही संकल्पना राबवून देवळे गावातील श्री गणेश मित्र मंडळाने 1994 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. गेली तब्बल 31 वर्षे गावातील युवा मंडळी, मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसाय करणारे ग्रामस्थ, सर्वजण एकत्र येऊन ऐक्याने हा उत्सव साजरा करत आहेत. यंदा या उत्सवाचे ३२ वे वर्ष विविध सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरे करण्यात आले. 🔹 रक्तदान शिबिराची परंपरा : गेली चार वर्षे सलग मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून शेकडो युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.यासाठी विशेष सहकार्य कूपर हॉस्पिटल रक्तपेढीचे लाभले 🔹 पर्यावरणपूरक सजावट : गणेशोत्सवात मंडळाने दरवर्षी पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य दिले आहे. या वर्षीही मंडप सजावटीत नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. 🔹 लर्निंग लायसन्स कॅम्प – तालु...

देवळे गावातील श्री गणेश मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम – लर्निंग लायसन्स कॅम्प व रक्तदान शिबिर समाजापुढे आदर्श

Image
पोलादपूर प्रतिनिधी ( प्रकाश कदम) पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे देवळे गाव हे केवळ कृषी पंढरी म्हणूनच नव्हे तर सांस्कृतिक परंपरा जपणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. “एक गाव – एक गणपती” ही संकल्पना राबवून देवळे गावातील श्री गणेश मित्र मंडळाने 1994 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. गेली तब्बल 31 वर्षे गावातील युवा मंडळी, मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी-व्यवसाय करणारे ग्रामस्थ, सर्वजण एकत्र येऊन ऐक्याने हा उत्सव साजरा करत आहेत. यंदा या उत्सवाचे ३२ वे वर्ष विविध सामाजिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरे करण्यात आले. 🔹 रक्तदान शिबिराची परंपरा : गेली चार वर्षे सलग मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून शेकडो युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.यासाठी विशेष सहकार्य कूपर हॉस्पिटल रक्तपेढीचे लाभले 🔹 पर्यावरणपूरक सजावट : गणेशोत्सवात मंडळाने दरवर्षी पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य दिले आहे. या वर्षीही मंडप सजावटीत नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. 🔹 लर्निंग लायसन्स कॅम्प – तालु...

काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावे – रणजीतसिंह देशमुख

Image
पाचगणी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक; युवा नेतृत्वाच्या सहभागातून संघटनवाढीचा संकल्प पाचगणी प्रतिनिधी : महाबळेश्वर-पाचगणी तालुक्यातील काँग्रेस पक्षाने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पाचगणी येथे झालेल्या या बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख अध्यक्षस्थानी होते. बैठकीदरम्यान रणजीतसिंह देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. विरोधकांना घरबसल्या ठेवायचे असेल तर आपल्या विचारधारेचा ठसा प्रत्येक घराघरात उमटवला पाहिजे. जनतेशी सातत्याने संपर्क ठेवा आणि संघटन बळकट करा.” या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते जयदीपदादा शिंदे उपस्थित होते. त्यांनी युवांना पुढाकार घेऊन पक्षाच्या विचारसरणीला व्यापक पातळीवर पोहोचविण्याचे आवाहन केले. “आजची लढाई ही विचारांची आहे. काँग्रेस पक्षाने दिलेल्या लोककल्याणकारी धोरणांचा ठसा पुन्हा उमटविण्याची हीच योग्य वेळ आहे. युवकांनी आघाडी घेतली तर पक...

“न्यायिकता व लोक सुरक्षा” या विषयावर ऍड. असीम सरोदे यांचे व्याख्यान

Image
सातारा प्रतिनिधी (अनिल वीर ): “न्यायिकता व लोक सुरक्षा” हा आजच्या समाजजीवनातील महत्त्वाचा व ज्वलंत विषय असून, संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार, न्यायाची हमी आणि लोकसुरक्षेचे तत्व हे लोकशाहीचे प्राण आहेत. याच विषयावर उच्च न्यायालय खंडपीठ कोल्हापूरचे वकील, संविधान विश्लेषक ऍड. असीम सरोदे यांनी सातारा येथे सखोल व्याख्यान दिले. हा कार्यक्रम दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. सातारा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील लढाऊ नेतृत्व, कष्टकरी व श्रमिक वर्गासाठी आयुष्यभर संघर्ष केलेले स्मृतीशेष कॉ. व्ही. एन. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉ. व्ही. एन. पाटील स्मारक समितीच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ऍड. असीम सरोदे यांचा संविधानाची प्रत आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. हा सत्कार महालक्ष्मी फाऊंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा सुनील शेलार , बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक व संविधान लोकजागर परिषदेचे संघटक अनिल वीर आणि सहकाऱ्यांनी केला. या व्याख्यान कार्यक्रमाला कॉ. व्ही. एन....

पाचगणीमधून मराठा आरक्षणासाठी उस्फूर्त पाठिंबा सरकारकडून दुर्लक्ष – मराठा समाजाचा संताप उफाळला

Image
पाचगणी प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २१ ऑगस्टपासून सुरू केलेल्या आंदोलनाला पाचगणी व परिसरातील मराठा समाज बांधवांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातून काढण्यात आलेल्या मराठा जागृती रॅलीत सरकारच्या उदासीन भूमिकेविरोधात संताप व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले. “मराठ्यांना न्याय द्या”, “आरक्षण आमचा हक्क आहे” अशा घोषणा देत रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकारला इशारा दिला की – “आता वेळ घालवू नका; आरक्षण द्या, अन्यथा संघर्ष अटळ." या रॅलीत अजितभाऊ कसुर्डे, अकुश आबा मालुसरे, यशवंत पाटे, संजय कसुर्डे, हरीश शेठ गोळे, शरद कसुर्डे, गजानन भिलारे, राजू आबा भिलारे, नितीन भाई भिलारे, सुनील बिरामणे, सुनील पार्टे, मोरेश्वर कसुर्डे, अरुण कसुर्डे, संदेश कसुर्डे, अमित भिलारे, संजय राजपुरे, जनार्दन कळंबे, आर.डी. मालुसरे,  विष्णू अप्पा मालुसरे, सदाशिव मालुसरे, गौरव कसुर्डे, सतीश दुधाण...

महाबळेश्वरातील प्रदीप कात्रट यांच्या वाढदिवसाचा जल्लोष विविध पक्ष, संघटना तसेच स्थानिक नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Image
--- महाबळेश्वर प्रतिनिधी : श्री क्षेत्र महाबळेश्वरातील तडफदार, अभ्यासू व पारदर्शक कार्यकर्ते प्रदीप कात्रट यांचा वाढदिवस गावकऱ्यांच्या, युवकांच्या तसेच मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागात अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस सोहळा केवळ आनंदाचा कार्यक्रम न ठरता सामाजिक एकता, युवकांची उपस्थिती आणि स्थानिक नेतृत्वाला मिळालेली मान्यता या रूपाने विशेष ठरला. --- मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून प्रदीप कात्रट यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक व युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण शेठ भिलारे, गुरेघर सरपंच रमेश शेठ चोरमले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रोहित ढेबे, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील पार्टे, शिव रक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिकेत काळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष ओंकार पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) तालुकाध्यक्ष आशिष चोरगे, टॅक्सी युनियन अध्यक्ष आप्पा भिलारे, अर्बन बँक संचालक सतीश ओंबळे, मांघर सरपंच गणेश ज...

महाबळेश्वरातील प्रदीप कात्रट यांच्या वाढदिवसाचा जल्लोष विविध पक्ष, संघटना तसेच स्थानिक नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Image
--- महाबळेश्वर प्रतिनिधी : श्री क्षेत्र महाबळेश्वरातील तडफदार, अभ्यासू व पारदर्शक कार्यकर्ते प्रदीप कात्रट यांचा वाढदिवस गावकऱ्यांच्या, युवकांच्या तसेच मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागात अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस सोहळा केवळ आनंदाचा कार्यक्रम न ठरता सामाजिक एकता, युवकांची उपस्थिती आणि स्थानिक नेतृत्वाला मिळालेली मान्यता या रूपाने विशेष ठरला. --- मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून प्रदीप कात्रट यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक व युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण शेठ भिलारे, गुरेघर सरपंच रमेश शेठ चोरमले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रोहित ढेबे, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील पार्टे, शिव रक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिकेत काळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष ओंकार पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) तालुकाध्यक्ष आशिष चोरगे, टॅक्सी युनियन अध्यक्ष आप्पा भिलारे, अर्बन बँक संचालक सतीश ओंबळे, मांघर सरपंच गणेश ज...

गणरायाच्या आगमनाने कोकणात गावोगावी उत्साह – बाजारपेठांमध्ये वर्दळ, घराघरात गणरायाची स्थापना

Image
पोलादपूर प्रतिनिधी : प्रकाश कदम कोकणवासीयांच्या सर्वांत जिव्हाळ्याच्या सणाला – गणेशोत्सवाला – सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यासह कोकणात गावोगावी गणरायाच्या स्वागताचा जल्लोष सुरू झाला आहे. २७ ऑगस्ट २०२५ रोजी मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले. तालुक्यात यंदा ७ सार्वजनिक मंडळे आणि तब्बल १,८१० घरगुती गणपती ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच ५३० गौरींचे आगमन ३१ ऑगस्ट रोजी होणार असून गावागावात तयारी जोरात सुरू आहे. गावागावात नवचैतन्य गणरायाच्या आगमनामुळे गावातील ओस पडलेली वाड्या–वस्ती गजबजून गेली आहे. पुणे–मुंबईसारख्या शहरांत नोकरी-उद्योग करणारे चाकरमानी आवर्जून गावी परतले आहेत. त्यामुळे वर्षभर बंद असलेल्या घरांना ताळे काढले गेले असून घराघरात आनंदाचा माहोल निर्माण झाला आहे. लहानगे मुलं गावच्या अंगणात खेळू लागली, तरुणांनी मित्रपरिवारासोबत गप्पांची मैफिली रंगवल्या आणि वृद्धांना मुलाबाळं व नातवंडे सोबत आल्याने समाधान लाभले आहे. बाजारपेठांत गजबज – उत्सवाला व्यापारी रंग गणेशोत्सवानिमित्त पोलादपूरसह आसपासच्या बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत. मोदक...

एससी समाजावर घोर राजकीय नाकेबंदी? – आगामी आरक्षण प्रक्रियेत खरी कसोटी” (अ‍ॅड.) डॉ. कुलदिप शिवराम यादव यांचा सवाल

Image
महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षण प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रक्रियेत अनुसूचित जाती (एससी) समाजाचा विचार होऊन त्यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळेल का? हा प्रश्न तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक चर्चेचा गाभा ठरला आहे. गेल्या कित्येक दशकांपासून तालुक्यातील एससी समाजाला जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या पातळीवर नेतृत्वाची संधी मिळालेली नाही. लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असूनही प्रतिनिधित्व शून्य राहणे हा विरोधाभास कुणीही नाकारू शकत नाही. २०११ च्या जनगणनेनुसार महाबळेश्वर तालुक्याची एकूण लोकसंख्या ७२,८३० असून त्यातील ८,२१८ (११.२८%) लोकसंख्या अनुसूचित जाती समाजाची आहे. तरीदेखील १९६७ मध्ये पंचायत समिती स्थापन झाल्यापासून आजपर्यंत तालुक्यातील एकाही गट अथवा गणात एससी समाजासाठी आरक्षण मिळालेले नाही. ग्रामपंचायतींच्या स्तरावर या समाजातील सरपंच, उपसरपंच, सदस्य किंवा पोलीस पाटील अशी पदे गाठली गेली आहेत. पण धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांचा आवाज कधीच उमटल...

खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यासाठी आरपीआय देशव्यापी आंदोलन करणार : रामदास आठवले

Image
महाबळेश्वर प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) विचारमंथन शिबिरातून अनेक ठराव पारित करत देशभरात मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रात आरक्षण धोरण लागू करणे, बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन भारतीय बौद्धांना सोपवणे, भूमिहीनांना जमीन वाटप करणे अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे. 🟢 प्रमुख ठराव व मागण्या ◼ खाजगी क्षेत्रात आरक्षण आरपीआयने ठामपणे मागणी केली की शासकीय नोकऱ्यांप्रमाणेच खाजगी क्षेत्रातही मागासवर्गीयांना आरक्षण मिळाले पाहिजे. ◼ महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण, प्रशासन व व्यवस्थापन भारतीय बौद्धांच्या ताब्यात यावे, यासाठी सर्व संघटनांना एकत्र आणून राष्ट्रीय स्तरावर आंदोलन उभारले जाणार आहे. ◼ भूमिहीनांना जमीन देशातील प्रत्येक भूमिहीन व्यक्तीस पाच एकर शेतीयोग्य जमीन द्यावी. ◼ मजुरांचे हक्क सर्व प्रकारच्या मजुरांचे किमान वेतन वाढवावे. कंत्राट पद्धत बंद करून सर्वांना नियमित सेवा व नियुक्ती द्यावी. ◼ स्वयंसेविकांचे मानधन वाढवावे अंगणवाडी सेविका व इतर स्वयंसेविकांच्या...

मराठा आंदोलकांना शशिकांत शिंदे यांचे सहकार्य

Image
महाबळेश्वर प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला विविध स्तरांवरून मदतीचे आणि सहकार्याचे हात पुढे येत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष  शशिकांत शिंदे यांनी आंदोलकांना मदतीची भूमिका स्पष्ट केली आहे. मागील आंदोलनावेळी जशी बाजार समितीच्या माध्यमातून मदत आणि सहकार्य देण्यात आले होते, त्याच धर्तीवर यावेळीही ती मदत करण्यास आपण तयार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. सहकार्याची स्पष्ट भूमिका शिंदे म्हणाले, “मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण व्हाव्यात ही सर्वांचीच इच्छा आहे. मागच्या वेळी जसे आंदोलकांना सहकार्य केले गेले, त्याचप्रमाणे यावेळीही गरज पडल्यास आम्ही मदतीला मागेपुढे पाहणार नाही.” त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनाला स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा बळ मिळण्याची शक्यता आहे. आंदोलनाला वाढती साथ मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन सध्या राज्यव्यापी झाले आहे. मुंबईकडे निघालेल्या या मोर्चामुळे प्रशासन सतर्क आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना आणि नेत्यांकडून आंदोलन...

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला रामदास आठवले यांचा जाहीर पाठिंबा

Image
मुंबईकडे निघालेल्या मोर्चामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले मुंबई प्रतिनिधी : मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्यासाठी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देणारे आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांना अखेर केंद्र सरकारमधील प्रमुख नेते आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ठाम पाठिंबा दिला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या आरपीआयच्या राज्यस्तरीय कार्यकारी बैठकीत त्यांनी भूमिका स्पष्ट केली की – “मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे; मात्र ते ओबीसींच्या हक्कांवर गदा न आणता मिळाले पाहिजे.” मुंबईकडे मोर्चा – आझाद मैदान उपोषणाची घोषणा जालना पोलिस आणि मुंबई पोलिस यांच्याकडून मिळालेल्या अटींसह परवानगीच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईकडे कूच केले आहे. 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. पोलिसांनी घातलेल्या अटींनुसार, हे आंदोलन केवळ एका दिवसापुरते (सकाळी 9 ते सायं. 6 वाजेपर्यंत) मर्यादित असेल, तसेच जास्तीत जास्त 5,000 आंदोलकांना परवानगी देण्यात आली आहे. जरांगे यांनी या अटी मान्य केल्या असल्या तरी...

महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गणरायाचे जल्लोषात आगमन

Image
पावसाळ्यातील ओलसर वातावरणात भक्तिभावाने उत्सव साजरा महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात गणेश चतुर्थीचा उत्सव यंदा पारंपरिक उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. सतत सुरू असलेल्या पावसाच्या सरी, दाट धुके आणि ओलसर हवामान असूनही गावोगावी बाप्पाच्या स्वागतासाठी अनोखा जल्लोष दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मंडळे तसेच घरगुती मंडपात पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. पावसाचा जोर असूनही गणरायाच्या स्वागतासाठी महिलांचा, युवकांचा आणि लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. चाकरमानी मंडळी मोठ्या उत्साहाने गावी परतली असून आपल्या कुटुंबियांसह गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी ग्रामीण भाग गजबजून टाकला आहे. पारंपरिक परंपरा, नातलगांची भेटीगाठी आणि एकत्रित पूजनाचा सोहळा यामुळे गावागावात उत्सवी वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी स्थानिक मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले आहेत. पावसाळ्यातील ओलसर हवामानामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी ...

जवाहर नवोदय विद्यालय, सातारा – इयत्ता ९वी व ११वी प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

Image
सातारा प्रतिनिधी : जवाहर नवोदय विद्यालय, सातारा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता नववी व अकरावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवड परिक्षेचे अर्ज मागविण्यात आले आहेत. ही माहिती विद्यालयाच्या प्राचार्या ॲन्सी ए. जे. यांनी दिली. पात्रता निकष नववी प्रवेशासाठी: विद्यार्थी शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान इयत्ता आठवीत शिकत असावा. त्याचा जन्म १ मे २०११ पूर्वी व ३१ जुलै २०१३ नंतरचा नसावा. अकरावी प्रवेशासाठी: विद्यार्थी २०२५-२६ मध्ये दहावी शिकत असावा. त्याचा जन्म १ जून २००९ पूर्वी व ३१ जुलै २०११ नंतरचा नसावा. वरील अट सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर सर्व उमेदवारांनाही लागू आहे. आरक्षण व विशेष संधी अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग, सर्व मुली व दिव्यांग संवर्गासाठी तसेच तृतीयपंथीय उमेदवारांसाठीही जागा राखीव आहेत. प्रवेशासाठी पालकांचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅबद्वारे अर्ज करू शकतात. अर्जासाठी ...

कोयना जलाशयातील जलवाहतुकीसाठी ७८ लाखांचा निधी मंजूर मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश – कर्मचाऱ्यांना दिलासा, नागरिकांना दिलासा

Image
जितेंद्र कारंडे प्रतापगड प्रतिनिधी : कोयना जलाशयातील दुर्गम व डोंगराळ भागात वाहन व प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाची ठरलेली जलवाहतूक सेवा पुन्हा गतीमान होणार आहे. मागील काही काळापासून लॉँच व बार्ज यांच्या देखभाल-दुरुस्ती, इंधन खर्च तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनाची मागणी प्रलंबित होती. अखेर मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने या सेवेसाठी ७८ लाख ७ हजार २८२ रुपयांचा निधी मंजूर करून पुणे विभागीय आयुक्तांकडे वितरित करण्यास मान्यता दिली आहे. कोयना धरणामुळे पाण्याखाली गेलेल्या गावांमधील दळणवळण टिकवण्यासाठी १९७६-७७ पासून तापोळा परिसरात जलवाहतूक सुरू करण्यात आली. हा तराफा केळघर, सोळशी, तापोळा व गाढवली दरम्यान छोट्या-मोठ्या वाहनांसह प्रवाशांची वाहतूक करतो. आजही या भागातील नागरिकांसाठी ही वाहतूक जीवनवाहिनी मानली जाते. स्थानिक ग्रामस्थांसोबतच पर्यटकही कोयना जलाशयावरून वाहनांसह प्रवास करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून १२ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते थकले होते. तसेच तराफ्याच्या दुरुस्ती व इंधन खर्चासाठी निधी न मिळाल्याने अडचणी निर्माण...

पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ साताऱ्यात

Image
सातारा, दि. 26 : नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घरबसल्या मिळावा, त्यांच्या अडचणी सोडवाव्यात या उद्देशाने राज्यात प्रथमच “पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी” हा उपक्रम सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरुवात झाली असून याचा शुभारंभ दौलतनगर येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे पालकमंत्री देसाई व सात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाला. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले की, डोंगरी पाटण मतदारसंघात छोट्या कामांसाठी लोकांना शासकीय कार्यालयांत फेरफटके मारावे लागू नयेत, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. समन्वयकांची टीम प्रत्येक घरी जाऊन अर्ज भरून घेईल, तक्रारींचा पाठपुरावा करेल आणि नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देईल. तांत्रिक अडचणी असल्यास त्यावर जिल्हास्तरीय बैठ...

श्री क्षेत्र महाबळेश्वरातील गणेशदादा धनावडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Image
महाबळेश्वर प्रतिनिधी : श्री क्षेत्र महाबळेश्वरातील उत्साही व तडफदार युवा कार्यकर्ते गणेशदादा धनावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करून महाबळेश्वर तालुक्यातील राजकारणाला नवा आयाम दिला आहे. धनावडे हे याआधी शिवसेना (शिंदे गट) मध्ये विभाग उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. परंतु पक्षाच्या मर्यादित चौकटीतून बाहेर पडून जनतेशी अधिक जवळीक साधण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या पक्षप्रवेश सोहळ्यास स्वतः मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील राजेंद्र शेठ राजपुरे श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बिरामणे, जेष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पुजारी, युवा नेतृत्व प्रदीप कात्रट, अनिल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. धनावडे यांनी प्रवेशानंतर आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य तालुक्यात राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या नेतृत्वाखाली जोरात सुरू आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजपुरे यांच्यासोबत काम कर...

महाबळेश्वरातील प्रदीप कात्रट यांच्या वाढदिवसाचा जल्लोष

Image
सामाजिक कार्यातून घडलेले नेतृत्व – गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाबळेश्वर प्रतिनिधी : श्री क्षेत्र महाबळेश्वरातील तडफदार, अभ्यासू व पारदर्शक कार्यकर्ते प्रदीप कात्रट यांचा वाढदिवस गावकऱ्यांच्या, युवकांच्या तसेच मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागात अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला. हा वाढदिवस सोहळा केवळ आनंदाचा कार्यक्रम न ठरता सामाजिक एकता, युवकांची उपस्थिती आणि स्थानिक नेतृत्वाला मिळालेली मान्यता या रूपाने विशेष ठरला. सोहळ्याला मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद आबा पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून प्रदीप कात्रट यांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक व तालुक्यातील युवा नेते राजेंद्र शेठ राजपुरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रवीण शेठ भिलारे, गुरेघर सरपंच रमेश शेठ चोरमले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष रोहित ढेबे, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुनील पार्टे, शिव रक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिकेत काळे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष ओंकार पवार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प.) तालुकाध्यक्ष आशिष चोरगे, टॅक्सी युनियन अध्यक्ष आप्पा भिलारे, अर्बन बँक संचाल...

"मोठ्या नेत्यांवर टीका करायची तर उंचीही मोठी हवी;"

Image
"एकनाथ शिंदे साहेबांचे नाव राजकारणासाठी वापरले तर जशास तसे उत्तर” – सुभाष कारंडे महाबळेश्वर प्रतिनिधी प्रतापगड संवर्धनाच्या मुद्द्यावरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना संघटक गणेश उतेकर यांनी मावळा प्रतिष्ठान व विरोधी नेत्यांवर केलेल्या वक्तव्यांना महाबळेश्वर तालुका अध्यक्ष सुभाष कारंडे यांनी जोरदार प्रतिवाद करत थेट इशारा दिला की, “मोठ्या नेत्यांवर टीका करण्याची हिम्मत दाखवायची असेल, तर आधी स्वतःची उंची तितकी असावी लागते. अन्यथा उगीच तोंडसुख घेणाऱ्यांना जनता आणि आम्ही दोघेही गप्प बसू देणार नाही.” “निलेश लंके, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांच्यावर टीका? हास्यास्पद!” कारंडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लोकनेते निलेश लंके यांची खासदारकी सहज मिळालेली नाही. त्यांनी प्रचंड मेहनत, संघर्ष आणि समाजकार्य करून ती जागा कमावली आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असून महाराष्ट्रभर त्यांचे ठोस योगदान आहे. तर जयंत पाटील यांनी अनेक मंत्रीपदे, पक्षाचे प्रदेशध्यक्षपद सांभाळत राज्याच्या...

पर्यावरणपूरक घरगुती गौरी-गणपती उत्सव स्पर्धा २०२५ : श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायतीकडून उपक्रम

Image
क्षेत्र महाबळेश्वर प्रतिनिधी : श्रीक्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत व ‘हिल्दारी’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक घरगुती गौरी गणपती उत्सव स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा घराघरांत होत असलेल्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरकता, पारंपरिक संस्कृती व सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम घडविण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून केला जाणार आहे. या संदर्भात माहिती देताना ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील बिरामणे म्हणाले, “गणेशोत्सव हा आपला लोकसण असून त्याला घराघरांतही मोठा उत्साह लाभतो. मातृशक्ती व तरुणाई या सणात नवनवीन कल्पकता दाखवतात. त्यांना व्यासपीठ मिळावे तसेच प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.” स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे : घरगुती गौरी-गणपती मूर्ती पर्यावरणपूरक व प्राणप्रतिष्ठित असावी (धातू, संगमरवर, फायबर, लाकूड व मातीची मूर्ती) – २० गुण पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करणे (दोलोत्सव, लेझीम, भजन-कीर्तन आदी) – २० गुण प्रदूषणमुक्त व स्वच्छता राखून पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे (फटाके-मुक्त, कचरा व्यवस्थापन आदी) –...

"प्रतापगडावर कचरा दाखवून राजकारण; मावळा प्रतिष्ठानची मोहिम सरकारविरोधी द्वेष पसरविणारी” – गणेश उतेकर

Image
महाबळेश्वर प्रतिनिधी प्रतापगडावरील अतिक्रमण आणि कचरा हटवून गडाला नवसंजीवनी देण्याचे मोठे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने केले असताना, काही तथाकथित सामाजिक संघटना आणि विरोधी नेते आता “गडकोट पण” मोहिमेच्या नावाखाली केवळ राजकीय दिखावा करत असल्याचा जोरदार आरोप शिवसेना संघटक श्री गणेश उतेकर यांनी केला. श्री. उतेकर म्हणाले की, “अनेक वर्ष गडावर कचरा आणि अतिक्रमण साठून राहिले. त्या काळात ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी केवळ न्यायालयीन बाबी दाखवून वेळ मारून नेला. मात्र शिंदे-फडणवीस-पवार यांच्या युती सरकारने खरी साफसफाई केली आणि प्रतापगडाचे पावित्र्य पुन्हा उजळवले. विरोधकांकडे दाखवायला काम नाही म्हणून आता ते बनावट मोहिमा राबवून लोकांची दिशाभूल करत आहेत.” विशेषत: मावळा प्रतिष्ठानवर निशाणा साधत ते म्हणाले की, “ही संघटना सामाजिक कार्याच्या नावाखाली सरकारविरुद्ध द्वेष पसरविण्याचे काम करत आहे. प्रत्यक्ष संवर्धनाच्या कामात काहीही योगदान नसताना फक्त गोंधळ माजविणे, सरकारविरोधी वातावरण तयार करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. गड संवर्धन करताना राजकारण टाकले नाही पाह...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!