Posts

Showing posts from February, 2026

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना ‘मीरा देशपांडे शिष्यवृत्ती’; अमनोरा एस फाउंडेशनकडून ५० हजारांची आर्थिक मदत

Image
 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना ‘मीरा देशपांडे शिष्यवृत्ती’; अमनोरा एस फाउंडेशनकडून ५० हजारांची आर्थिक मदत   महाबळेश्वर प्रतिनिधी  :  अमनोरा एस फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना ‘मीरा देशपांडे शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. या उपक्रमांतर्गत कु. स्वप्नाली भाऊ बोराणे, कु. अनुष्का गणपत रिंगे, कु. श्रुती दीपक वाडकर, कु. श्रेया जयवंत ढेबे आणि कु. आर्या मोहन केळगणे या पाच विद्यार्थिनींना प्रत्येकी १० हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन एकूण ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, आर्थिक अडचणींवर मात करत त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी अमनोरा एस फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रसाद जाधव, मुख्य सामाजिक अधिकारी श्री. विवेक कुलकर्णी, श्री. हर्षद वर्कट उपस्थित होते. तसेच महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. सुनील शिंदे,...

अवैध जंगल सफारीचा पर्दाफाश; भिलार–मेढा रोडवरील गुलाब पॉईंट व तळेमाळ दारिपॉईंट येथे पर्यटकांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष

Image
अवैध जंगल सफारीचा पर्दाफाश; भिलार–मेढा रोडवरील गुलाब पॉईंट व तळेमाळ दारिपॉईंट येथे पर्यटकांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाचे गंभीर दुर्लक्ष पाचगणी प्रतिनिधी – भिलार ते मेढा रोडवरील गुलाब पॉईंट तसेच तळेमाळ येथील मंदिराजवळील बन दारिपॉईंट परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध जंगल सफारीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही हॉटेल व्यावसायिकांशी संगनमत करून जुना, भंगारात काढलेला व स्क्रॅप झालेला वाहनसाठा बाहेरून आणला जात असून, केवळ रंगरंगोटी करून या गाड्या बेकायदेशीरपणे जंगल सफारीसाठी वापरल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या गाड्यांकडे कोणतीही अधिकृत वनपरवानगी, आरटीओ मान्यता, फिटनेस प्रमाणपत्र किंवा विमा नसतानाही दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटकांना जंगलात नेले जात आहे. या जंगल परिसरात गवे, बिबटे, अस्वल यांसारखे हिंसक वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. अशा परिस्थितीत कोणतीही सुरक्षितता उपाययोजना, प्रशिक्षित चालक, मार्गदर्शक किंवा संरक्षण व्यवस्था नसताना पर्यटकांना जंगलात नेणे म्हणजे त्यांच्या जीवाशी थेट खेळ करण्यासारखे असल्य...

दि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मा. सी. डी. बावळेकर, उपाध्यक्षपदी श्री. नदीम भाई शारवान यांची बिनविरोध निवड; संचालक मंडळाकडून अभिनंदनाचा वर्षाव

Image
दि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मा. सी. डी. बावळेकर, उपाध्यक्षपदी श्री. नदीम भाई शारवान यांची बिनविरोध निवड; संचालक मंडळाकडून अभिनंदनाचा वर्षाव महाबळेश्वर प्रतिनिधी :  दि महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी मा. सी. डी. बावळेकर आणि उपाध्यक्षपदी श्री. नदीम भाई शारवान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाची विशेष बैठक घेऊन ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष मा. सी. डी. बावळेकर यांनी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संचालक, कर्मचारी आणि सभासदांना विश्वासात घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख व कार्यक्षम कारभार करण्याचा संकल्प व्यक्त केला. बँकेची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकाभिमुख सेवा, कर्जवाटपात पारदर्शकता राखणे तसेच ग्रामीण भागातील सभासदांसाठी विशेष योजना राबविण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नवीन उपाध्यक्ष श्री. नदीम भाई शारवान यांनीही बँकेच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन सहकार्याची भूमिका निभावण्याचे आश्वासन दिले...

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा ऐतिहासिक निर्णय; ग्रामीण प्रशासनात तज्ज्ञांचा सहभाग वाढणार

Image
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा ऐतिहासिक निर्णय; ग्रामीण प्रशासनात तज्ज्ञांचा सहभाग वाढणार मुंबई प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीत मोठा बदल घडणार आहे. आतापर्यंत ही पद्धत केवळ महानगरपालिका आणि नगरपालिकांपुरती मर्यादित होती. मात्र, आता ग्रामीण भागातील प्रशासन अधिक सक्षम, परिणामकारक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चालावे, या उद्देशाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्य नियुक्तीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयाची पार्श्वभूमी अशी की, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रामीण भागातही शहरी संस्थांप्रमाणे तज्ज्ञ व्यक्तींना प्रशासनात सहभागी करून घेण्याची मागणी केली होती. ग्रामीण विकासाच्या विविध क्षेत्रांत अनुभव असलेल्या व्यक्तींचा उपयोग करून घेता यावा, प्रशासन अधिक गतिमान व्हावे आणि धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावीपणे राब...

जलजीवन मिशन रखडले; पाणी वाया, नागरिक तहानलेले!कुंभरोशीत अर्धवट पाईपलाईन, सतत गळती व निकृष्ट कामामुळे ग्रामस्थ हैराण; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Image
जलजीवन मिशन रखडले; पाणी वाया, नागरिक तहानलेले! कुंभरोशीत अर्धवट पाईपलाईन, सतत गळती व निकृष्ट कामामुळे ग्रामस्थ हैराण; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा कुंभरोशी | प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत सन २०२२ मध्ये मंजूर झालेल्या पाईपलाईन योजनेचे काम कुंभरोशी गावात अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, कंत्राटदाराची मनमानी, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही संपूर्ण योजना अडचणीत सापडली आहे. गावात चार विहिरी आणि चार पाण्याच्या टाक्या उपलब्ध असतानाही नागरिकांना नियमित व पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गावात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, प्रत्येक घराला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने मोठ्या निधीतून पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हे काम अर्धवट अवस्थेतच थांबले असून अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचा काळा गोटा पाईप वापरण्यात आल्याने सतत गळती होत आहे. परिणामी दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यांवर, मोकळ्या जागेत आणि शेतात वाया जात असून दुस...

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार पिडीतांना संरक्षणासह न्याय देणे हेच प्रशासनाचे ध्येय – जिल्हाधिकारी संतोष पाटील

Image
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार पिडीतांना संरक्षणासह न्याय देणे हेच प्रशासनाचे ध्येय – जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा  प्रतिनिधी :  अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार पिडीतांना केवळ संरक्षणच नव्हे तर वेळेत आणि प्रभावी न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची ठाम भूमिका असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्पष्ट केले. अत्याचार प्रकरणांमध्ये चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यासाठी पिडीतांकडे जातीचा दाखला आवश्यक असतो. मात्र अनेक पिडीतांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याने अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेऊन संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करावीत व त्यांना तातडीने जातीचे दाखले मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह पोलीस प्रशासन व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित अत्याचार प्रकरणांचा आढावा घेण्यात आला तसेच ...

पाचगणीत ईडीची धडक कारवाई; ‘काही उद्योगपतींच्या बंगल्यां’चा मोठा हिस्सा जप्त, पर्यटननगरीत खळबळ

Image
पाचगणीत ईडीची धडक कारवाई; ‘काही उद्योगपतींच्या बंगल्यां’चा मोठा हिस्सा जप्त, पर्यटननगरीत खळबळ ✍️महेश ननावरे पाचगणी प्रतिनिधी :   –  पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी आणि धक्कादायक कारवाई करत काही नामवंत उद्योगपतींशी संबंधित बंगल्यांच्या मालमत्तेतील दोन-तृतीयांश अविभाजित हिस्सा ताब्यात घेतला आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील उद्योग, राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई विभागीय कार्यालयाकडून (MBZO-I/07/2019) नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाअंती ही कारवाई करण्यात आली असून, ईडीचे उपसंचालक अमिताभ मिश्रा यांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार कलम ८ (४) अन्वये या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला आहे. पाचगणीतील एका बड्या उद्योगपतीशी संबंधित आर्थिक व्यवहार, मालमत्ता व्यवहार आणि त्यासंबंधीच्या कागदपत्रांच्या आधारे ही जप्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या मालमत्तेबाबत यापूर्वीच २० ऑक्टोबर २०२०...

आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला; मोरीत कोंबून ठेवलेला मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलादपूर पोलिसांचा कसून तपास सुरू

Image
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला; मोरीत कोंबून ठेवलेला मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलादपूर पोलिसांचा कसून तपास सुरू प्रतापगड प्रतिनिधी : आंबेनळी घाट परिसरात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोका खाली व चिरेखिंडच्या वरती असलेल्या मुख्य रस्त्यालगत एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह मोरीत कोंबून ठेवलेला आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत संशयास्पद आणि धक्कादायक स्वरूपाच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही हत्या असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी आंबेनळी घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगत असलेल्या मोरीत डोकावून पाहिले असता त्यांना एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलादपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा ...

पाचगणीच्या टेबललँडवरील तलाव नूतनीकरणास प्रारंभ; पर्यटन, पर्यावरण व जलसंधारणाला नवी ऊर्जा

Image
पाचगणीच्या टेबललँडवरील तलाव नूतनीकरणास प्रारंभ; पर्यटन, पर्यावरण व जलसंधारणाला नवी ऊर्जा ✍️महेश ननावरे, पाचगणी प्रतिनिधी :  निसर्गरम्य पाचगणी येथील प्रसिद्ध टेबललँड परिसरातील तलावाच्या नूतनीकरण व गळती थांबविण्याच्या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ नगरपालिकेच्या वतीने माननीय नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी पंडित पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, राजेंद्र पार्टे, महेश खांडके, अनिता चोपडे, माधुरी कासुर्डे, विमल भिलारे, अमृता गोळे, अक्षय बगाडे, गणेश कासुर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पाचगणी येथील टेबललँडवरील तलावाचे नूतनीकरण व गळती काढण्याचे काम पर्यटनाच्या आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आणि दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अमृत-दोन योजनेअंतर्गत राबविण्यात येत असून, त्यासाठी नगरपालिकेला ४ कोटी ६२ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. हा निधी मिळवण्यासाठी माननीय मकरंद आबा पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याचे मनोगत शेखर कासुर्डे यांनी व...

ली-मेरेडियन हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; संशयित सेल्स असिस्टंट मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल

Image
ली-मेरेडियन हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन; संशयित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल महाबळेश्वर प्रतिनिधी :  येथील नामांकित ली-मेरेडियन हॉटेलमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी हॉटेलमधीलच एका संशयित कर्मचाऱ्याविरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला गेल्या तीन महिन्यांपासून संबंधित हॉटेलमध्ये वेलनेस मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. जानेवारी महिन्यात दोन वेळा हॉटेल परिसरात काम करत असताना संशयिताने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शेलार करत असून, पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तसेच या गुन्ह्यात ई-साक्षी प्रणालीअंतर्गत SID तयार करण्यात आली आहे. पर्यटननगरी महाबळेश्वरमधी...

आंधळीमध्ये भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण संस्कृतीचा उत्सव

Image
आंधळीमध्ये भव्य बैलगाडी शर्यतीचा थरार; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण संस्कृतीचा उत्सव ✍️ विजय जाधव, सातारा प्रतिनिधी :  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत माण तालुक्यातील आंधळी (जि. सातारा) येथे ग्रामपंचायत आंधळीच्या वतीने भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण परंपरा, शौर्य, मेहनत आणि शेतकरी संस्कृतीचा अभिमान जपणाऱ्या या थरारक शर्यती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच दादासाहेब काळे यांनी केले आहे. ही स्पर्धा गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता आंधळी ते टाकेवाडी रोडवर होणार असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत बैलगाडी संघांचा सहभाग अपेक्षित आहे. अत्यंत चुरशीच्या आणि कौशल्यपूर्ण लढतींचे साक्षीदार होण्याची संधी या निमित्ताने ग्रामस्थांना आणि परिसरातील नागरिकांना मिळणार आहे. या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकासाठी ६१ हजार रुपये, द्वितीय ४९ हजार रुपये, तृतीय ३१ हजार रुपये, चौथा २१ हजार रुपये, सहावा १० हजार रुपये आणि सातवा ६ हजार रुपये अशी आकर्षक रोख पारितोषिके तसे...

कुंभरोशी गणातील निवडणूक वाद थेट न्यायालयात; संजय मोरे विजयी झाल्यानंतर समीर चव्हाण यांची निवडणूक याचिका, २७ फेब्रुवारीला सुनावणी

Image
 कुंभरोशी गणातील निवडणूक वाद थेट न्यायालयात; संजय मोरे विजयी झाल्यानंतर समीर चव्हाण यांची निवडणूक याचिका, २७ फेब्रुवारीला सुनावणी वाई / महाबळेश्वर (प्रतिनिधी) :  महाबळेश्वर पंचायत समिती अंतर्गत कुंभरोशी गणातील निवडणूक लढतीने आता थेट न्यायालयीन वळण घेतले असून, प्रत्यक्ष निवडणुकीत संजय हरिश्चंद्र मोरे हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद अधिक तीव्र झाला आहे. उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळल्यानंतर तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर समीर मधुकर चव्हाण यांनी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरातील राजकीय वातावरण तापले आहे. बिरवाडी (ता. महाबळेश्वर) येथील रहिवासी समीर मधुकर चव्हाण यांनी २२ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती महाबळेश्वरचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संजय मोरे यांच्या उमेदवारी अर्जावर गंभीर आक्षेप नोंदवले होते. तक्रारीत संजय मोरे हे ‘अशोका मजूर संस्था’ या संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष असून त्यांनी शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची अनेक कंत्राटे घेतल्यान...

कास पुष्प पठारावर दुर्मिळ 'पाचगणी दुधणी'चे विलोभनीय फुलोरे; जगात अन्यत्र कुठेही न आढळणाऱ्या या वनस्पतीने निसर्गप्रेमींचे मन जिंकले

Image
कास पुष्प पठारावर दुर्मिळ 'पाचगणी दुधणी'चे विलोभनीय फुलोरे; जगात अन्यत्र कुठेही न आढळणाऱ्या या वनस्पतीने निसर्गप्रेमींचे मन जिंकले कास (प्रतिनिधी) : जागतिक वारसा स्थळ म्हणून जगभरात नावाजलेल्या कास पुष्प पठारावर यंदा एक अत्यंत दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण क्षण अनुभवायला मिळत आहे. 'पाचगणी दुधणी' या केवळ सातारा जिल्ह्यापुरत्याच मर्यादित असलेल्या अनोख्या वनस्पतीची गुलाबी व पांढऱ्या रंगांची नाजूक फुले सध्या पठारावर उमलू लागली असून, निसर्गप्रेमी, पर्यटक, छायाचित्रकार आणि वनस्पती संशोधकांमध्ये विलक्षण उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जमिनीतून थेट बाहेर डोकावणाऱ्या या फुलांनी पठारावर एक वेगळाच जादुई माहौल तयार केला आहे. जगात फक्त इथेच — एक अनमोल नैसर्गिक ठेवा 'युफोर्बिया पंचगणेंसिस' (Euphorbia panchganiensis) असे शास्त्रीय नाव असलेली ही वनस्पती स्थानिक भाषेत 'पाचगणी दुधणी' म्हणून परिचित आहे. या वनस्पतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची नैसर्गिक व्याप्ती. सातारा जिल्ह्यातील पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार आणि सह्याद्रीच्या काह...

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून; ६ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प

Image
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून; ६ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार अर्थसंकल्प मुंबई प्रतिनिधी :  महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या, सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत असून हे अधिवेशन २५ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात राज्याचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी विधानसभेत सादर केला जाणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला असून, यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मांडणार असल्याने या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त व नियोजन विभागाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प सादर करण्याची दुर्मिळ घटना यंदा घडणार असून, राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय इतिहासात हा क्षण महत्त्वाचा ठरणार आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती, विकासकामांसाठीची तरतूद, शेतकरी, महिला, युवक, उद्योग आणि पायाभूत सुविधां...

कुंभरोशीतील बाजार संकुलाची दयनीय अवस्था; कचऱ्याचे साम्राज्य, शौचालयांची दुरवस्था आणि ग्रामपंचायतीचे असंवेदनशील दुर्लक्ष

Image
कुंभरोशीतील बाजार संकुलाची दयनीय अवस्था; कचऱ्याचे साम्राज्य, शौचालयांची दुरवस्था आणि ग्रामपंचायतीचे असंवेदनशील दुर्लक्ष कुंभरोशी (प्रतिनिधी) :  कुंभरोशी गावातील वानेची अळी परिसरात, मुख्य रस्त्यालगत ग्रामपंचायतीच्या जागेवर उभारलेल्या बाजार संकुलाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, येथे सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. दर रविवारी भरत असलेल्या आठवडी बाजारामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची, व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची गर्दी होत असते. मात्र या बाजार संकुलाच्या स्वच्छता, देखभाल आणि मूलभूत सुविधांकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बाजार संकुल परिसरात कचरा उचलण्याची कोणतीही नियमित व्यवस्था नसल्याने भाजीपाला, फळे, प्लास्टिक, कागद, उरलेले अन्न आणि इतर टाकाऊ साहित्य यांचा ढिग साचलेला दिसून येतो. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डास, माश्या आणि उंदरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक...

नवी दिल्लीतील AI समिटदरम्यान अर्धनग्न आंदोलनावर संताप; तापोळा (ता. महाबळेश्वर) येथे शिवसेना शिंदे गटाकडून राहुल गांधींच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन, पुतळादहन

Image
नवी दिल्लीतील AI समिटदरम्यान अर्धनग्न आंदोलनावर संताप; तापोळा (ता. महाबळेश्वर) येथे शिवसेना शिंदे गटाकडून राहुल गांधींच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन, पुतळादहन तापोळा प्रतिनिधी – नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे काल पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय एआय समिटमध्ये जगभरातील अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित असताना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची भूमिका आणि दृष्टीकोन प्रभावीपणे मांडत होते. या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी अर्धनग्न आंदोलन करून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, भारताच्या जागतिक प्रतिमेला काळिमा फासण्याचा हा प्रकार असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील तापोळा (ता. महाबळेश्वर) येथेही या निषेधाला तीव्र स्वरूप देण्यात आले. सातारा जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून तापोळा येथे जोरदार घोषणाबाजी करत...

कृष्णा तीरावर २०२८ मध्ये ‘कन्यागत महापर्वकाल’ : महाबळेश्वर ते नृसिंहवाडी भक्तीचा महासोहळा

Image
कृष्णा तीरावर २०२८ मध्ये ‘कन्यागत महापर्वकाल’ : महाबळेश्वर ते नृसिंहवाडी भक्तीचा महासोहळा प्रतिनिधी | महाबळेश्वर गुरू ग्रहाच्या कन्या राशीतील प्रवेशामुळे दर बारा वर्षांनी साजरा होणारा ‘कन्यागत महापर्वकाल’ हा कृष्णा नदीच्या तीरावरचा अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक उत्सव असून, २०२८ साली हा महापर्व पुन्हा एकदा संपूर्ण कृष्णा खोऱ्यात मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा होणार आहे. महापर्वकाल म्हणजे महान पुण्यकाळ. ज्या काळात गंगा नदी स्थानिक नद्यांमध्ये अवतरते, अशी धार्मिक श्रद्धा असून, या पर्वकाळात स्नान, दान, जप, तप, पूजन यांना विशेष पुण्यप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. गुरू ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास बारा वर्षे लागतात. त्यामुळे दरवर्षी गुरू वेगवेगळ्या राशीत प्रवेश करतो. गुरू कुंभ राशीत गेला की गंगा नदीच्या तीरावर कुंभमेळा, सिंह राशीत गेला की गोदावरीच्या तीरावर सिंहस्थ कुंभमेळा साजरा होतो. त्याचप्रमाणे गुरू कन्या राशीत प्रवेश करताच कृष्णा नदीच्या तीरावर ‘कन्यागत महापर्वकाल’ साजरा केला जातो. हा पर्वकाळ कृष्णा नदीच्या उगमाप...

सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच; सदस्य अज्ञातस्थळी हलवले

Image
सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीतच जोरदार रस्सीखेच; सदस्य अज्ञातस्थळी हलवले सातारा  प्रतिनिधी:  सातारा जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी अध्यक्षपदावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तीव्र सत्तास्पर्धा निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेचे नेमके गणित कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत मोठे कुतूहल निर्माण झाले असून, संभाव्य फूट टाळण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या सदस्यांना सोमवारी रात्री अज्ञातस्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हा परिषदेत एकूण ६५ जागांपैकी महायुतीने तब्बल ६३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामध्ये भाजपाला सर्वाधिक २७ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २१ जागा, शिवसेना (शिंदे गट) १५ जागा, काँग्रेस १ आणि अपक्ष २ जागा मिळाल्या आहेत. मात्र महायुतीतील कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर बहुमत न मिळाल्याने अध्यक्षपदासाठी अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. तिन्ही पक्षांनी अध्यक्षपदावर दावा केल्यामुळे सत्ता वाटपाचे गणित गुंतागुंतीचे बनले आहे. ...

सातारा जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल; स्थानिक समीकरणांनुसार निर्णय होईल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
सातारा जिल्हा परिषदेवर महायुतीचाच झेंडा फडकेल; स्थानिक समीकरणांनुसार निर्णय होईल — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतापगड प्रतिनिधी —  राज्यातील विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला असून, तोच जनादेश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मान्य केला जाईल. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीत स्थानिक राजकीय समीकरणांनुसार महायुतीच विजयी होईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री शिंदे हे शुक्रवारी रात्री दरे गावात मुक्कामी आले होते. शनिवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सातारा जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. जिल्ह्यात भाजपने मित्र पक्षांनाच लक्ष्य केले, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीदरम्यान आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, राज्यात महायुतीचे सरकार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात एनडीए एकजुटीने काम करत आहे. गेल्या साडेतीन वर्षांत महाराष्ट्राला विकासाच्या ...

कांदाटी खोऱ्यात स्वप्नवत विकासाचे पर्व; दुर्गमतेतून विकासाकडे वेगाने वाटचाल

Image
कांदाटी खोऱ्यात स्वप्नवत विकासाचे पर्व; दुर्गमतेतून विकासाकडे वेगाने वाटचाल जितेंद्र करंडे,  महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यात आता विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, या भागाचा चेहरामोहरा झपाट्याने बदलताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या दुर्गम परिसरात शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून, दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले रस्ते बळकट आणि सुलभ करण्यात येत आहेत. पूर्वी महाबळेश्वर येथून कांदाटी खोऱ्यात पोहोचण्यासाठी तब्बल आठ ते दहा तासांचा कठीण प्रवास करावा लागत होता. खराब रस्ते, डोंगराळ भूप्रदेश आणि मर्यादित वाहतूक सुविधा यामुळे हा भाग मुख्य प्रवाहापासून तुटलेला होता. मात्र, आता नव्या रस्त्यांमुळे हा प्रवास अवघ्या एका तासात शक्य झाला असून, स्थानिक नागरिकांसह व्यापारी, पर्यटक आणि प्रशासनासाठीही हा मोठा दिलासा ठरला आहे. कोट्रोशी ते उचाट या मार्गाचे काम सुरू झाल्याने दीर्घकाळ संपर्कापासून वंचित असले...

कांदाटी खोऱ्यात स्वप्नवत विकासाचे पर्व; दुर्गमतेतून विकासाकडे वेगाने वाटचाल

Image
कांदाटी खोऱ्यात स्वप्नवत विकासाचे पर्व; दुर्गमतेतून विकासाकडे वेगाने वाटचाल जितेंद्र करंडे,  महाबळेश्वर प्रतिनिधी – महाबळेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदाटी खोऱ्यात आता विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून, या भागाचा चेहरामोहरा झपाट्याने बदलताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या दुर्गम परिसरात शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून, दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले रस्ते बळकट आणि सुलभ करण्यात येत आहेत. पूर्वी महाबळेश्वर येथून कांदाटी खोऱ्यात पोहोचण्यासाठी तब्बल आठ ते दहा तासांचा कठीण प्रवास करावा लागत होता. खराब रस्ते, डोंगराळ भूप्रदेश आणि मर्यादित वाहतूक सुविधा यामुळे हा भाग मुख्य प्रवाहापासून तुटलेला होता. मात्र, आता नव्या रस्त्यांमुळे हा प्रवास अवघ्या एका तासात शक्य झाला असून, स्थानिक नागरिकांसह व्यापारी, पर्यटक आणि प्रशासनासाठीही हा मोठा दिलासा ठरला आहे. कोट्रोशी ते उचाट या मार्गाचे काम सुरू झाल्याने दीर्घकाळ संपर्कापासून वंचित असले...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!