Posts

महाबळेश्वर एसटीच्या बसला पुन्हा ‘स्टीअरिंग लॉक’! झोलखिंडीत बस थांबली; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर काल ब्रेक फेल, आज स्टीअरिंग लॉक; मोठा अनर्थ होण्यापूर्वी एसटी प्रशासन जागे होणार का?

Image
महाबळेश्वर एसटीच्या बसला पुन्हा ‘स्टीअरिंग लॉक’! झोलखिंडीत बस थांबली; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर काल ब्रेक फेल, आज स्टीअरिंग लॉक; मोठा अनर्थ होण्यापूर्वी एसटी प्रशासन जागे होणार का? महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर एसटी आगारातील बसच्या तांत्रिक बिघाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाबळेश्वर–तापोळा मार्गावर काल ब्रेक फेल झाल्याची घटना घडून पाच प्रवाशांना दुखापत झाल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आज झोलखिंड परिसरात एका एसटी बसचे स्टीअरिंग लॉक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असून, एसटी प्रशासनाच्या बस तपासणी व देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोलखिंड परिसरात प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस अचानक थांबली. बसचे स्टीअरिंग लॉक झाल्याचे सांगण्यात येत आहे. डोंगराळ भागातील वळणावळणाच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त नाही. काल ब्रेक फेल; आज स्टीअरिंग लॉक मह...

केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम यांचा १२ सप्टेंबरला सेवापूर्ती गौरव सोहळा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेला मानाचा मुजरा; तळदेव येथे दुपारी १ ते ४ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन

Image
केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम यांचा १२ सप्टेंबरला सेवापूर्ती गौरव सोहळा शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेला मानाचा मुजरा; तळदेव येथे दुपारी १ ते ४ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन तापोळा प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेले केंद्र मांघरचे केंद्रप्रमुख श्री. चंद्रकांत कृष्णा जंगम यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत तळदेव येथील तळेश्वर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शिक्षकांच्या कार्याला दिशा देत केंद्रप्रमुख म्हणून श्री. जंगम यांनी बजावलेल्या सेवेला यानिमित्ताने मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या सेवाकाळातील योगदानाबद्दल शिक्षक, ग्रामस्थ, सहकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद पाटील (आबा) यांच्या हस्ते...

‘प्रत्येक गावची एक समस्या, सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न’ — १०५ गाव कार्यकारणी समितीचा अभिनव उपक्रम गावातील सार्वजनिक जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांना आवाहन; समस्या लेखी स्वरूपात ग्रुपवर पाठवण्याचे आवाहन

Image
‘प्रत्येक गावची एक समस्या, सोडवण्यासाठी एकत्रित प्रयत्न’ — १०५ गाव कार्यकारणी समितीचा अभिनव उपक्रम गावातील सार्वजनिक जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांना आवाहन; समस्या लेखी स्वरूपात ग्रुपवर पाठवण्याचे आवाहन महाबळेश्वर प्रतिनिधी : १०५ गावांतील नागरिकांच्या सार्वजनिक व जनहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडून ते प्रश्न संबंधित लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी तसेच शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी १०५ गाव कार्यकारणी समिती, मुंबई यांच्या वतीने अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक गावातून संपूर्ण गावाच्या हिताची किमान एक महत्त्वाची सार्वजनिक समस्या निवडून ती लेखी स्वरूपात समितीकडे पाठवावी , असे आवाहन करण्यात आले आहे. गावागावांमध्ये अनेक वर्षांपासून रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य, वीज, वाहतूक, सार्वजनिक स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच इतर विविध नागरी सुविधांशी संबंधित समस्या प्रलंबित आहेत. या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवण्यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज आहे. याच उद्देशाने १०५ गाव कार्यकारणी समितीने हा उपक्रम सुरू केला आहे. ...

अमरावती-वर्धा जिल्ह्यात दहशत माजवणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद; वन विभागाच्या थरारक कारवाईने नागरिकांचा सुटकेचा श्वास

Image
अमरावती-वर्धा जिल्ह्यात दहशत माजवणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद; वन विभागाच्या थरारक कारवाईने नागरिकांचा सुटकेचा श्वास अमरावती प्रतिनिधी :   गेल्या वीस दिवसांपासून अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांतील ग्रामीण भागात प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या आणि चार निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या उपद्रवी वाघिणीला अखेर वन विभागाच्या विशेष पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले. चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा शिवारात ट्रँक्विलायझर गनच्या साहाय्याने गुंगीचे औषध देऊन तिला जेरबंद करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे, अशी माहिती अमरावतीचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अर्जुना के. आर. यांनी दिली. चार निष्पाप नागरिकांचा घेतला होता बळी या वाघिणीने वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून आपला प्रवास सुरू केला होता. तेथून अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी आणि चांदूर बाजार या तालुक्यांत धुमाकूळ घालत तिने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले तसेच २० दिवसांच्या कालावधीत चार जणांना ठार केले. या हल्ल्यांत खालील नागरिकांना प्राण गमवावे लागले: रामभाऊ भोयर (वय ७४) – ...

तळदेव प्रभाग समितीची १७ सप्टेंबरला आढावा सभा; विविध विभागांच्या कामकाजासह निधी व योजनांचा होणार सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनावरही चर्चा; विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

Image
तळदेव प्रभाग समितीची १७ सप्टेंबरला आढावा सभा; विविध विभागांच्या कामकाजासह निधी व योजनांचा होणार सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनावरही चर्चा; विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन महाबळेश्वर प्रतिनिधी : तळदेव प्रभाग समितीची आढावा सभा गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तळदेव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत तळदेव प्रभागातील विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, विभागनिहाय कामकाज तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील उपलब्ध निधीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. पंचायत समिती महाबळेश्वरच्या प्रशासन विभागाच्या वतीने या सभेबाबतचे अधिकृत पत्र दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे. तळदेव प्रभाग समितीचे अध्यक्ष अजित रामचंद्र संकपाळ , जि.प. सदस्य तथा सहअध्यक्ष संजय हरिश्चंद्र मोरे , पंचायत समितीचे उपसभापती तसेच सदस्य संजय विठ्ठल शेलार यांना सभेस उपस्थित राहणार आहेत. मागील सभेच्या कार्यवृत्तांतापासून विकासकामांच्या आढाव्यापर्यंत स...

संकटात धावणाऱ्या ‘जीवनदूतां’चा सन्मान! प्रतापगड रेस्क्यू टीमचा रायगड पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानात गौरव; सेवाभाव आणि धाडसाची दखल

Image
संकटात धावणाऱ्या ‘जीवनदूतां’चा सन्मान! प्रतापगड रेस्क्यू टीमचा रायगड पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानात गौरव; सेवाभाव आणि धाडसाची दख ल प्रतापगड प्रतिनिधी : अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणे, संकटात सापडलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही क्षणी मदतीसाठी धावून जाणाऱ्या प्रतापगड रेस्क्यू टीमच्या सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांचा ‘जीवनदूत’ म्हणून सन्मान करण्यात आला. रायगड पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत झालेल्या जीवनदूत सन्मान सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. अपघाताच्या घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचून जखमींना मदत करणे, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहकार्य करणे, तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, अशी प्रतापगड रेस्क्यू टीमची भूमिका राहिली आहे. अनेक संकटाच्या प्रसंगी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता टीमने केलेल्या मदतीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उल्लेखनीय कार्याची पावती म्ह...

महाबळेश्वरात ग्रामविकास विभागाची दोन दिवसीय महामंथन कार्यशाळा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासह विविध ग्रामीण विकास योजनांचा सखोल आढावा; जिल्हास्तरीय अडचणींवर उपाययोजनांसाठी होणार विचारमंथन

Image
महाबळेश्वरात ग्रामविकास विभागाची दोन दिवसीय महामंथन कार्यशाळा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासह विविध ग्रामीण विकास योजनांचा सखोल आढावा; जिल्हास्तरीय अडचणींवर उपाययोजनांसाठी होणार विचारमंथन महाबळेश्वर प्रतिनिधी :   ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार महाबळेश्वर येथे दि. ११ व १२ सप्टेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय महामंथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांसह ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा या कार्यशाळेत सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. याबाबत पंचायत समिती महाबळेश्वरचे गटविकास अधिकारी विजय विभुते यांनी माहिती दिली. महाबळेश्वर येथील अव्रशाईन रिसॉर्ट येथे होणाऱ्या या कार्यशाळेस राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य क...

ग्राहकांच्या हक्कांसाठी संघटित होण्याचे आवाहन; सेलूत ग्राहक पंचायतचा स्थापना दिन उत्साहात ग्राहक जागृतीतून शोषणमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प; कार्यकर्त्यांचा स्नेह-परिचय मेळावा उत्साहात

Image
ग्राहकांच्या हक्कांसाठी संघटित होण्याचे आवाहन; सेलूत ग्राहक पंचायतचा स्थापना दिन उत्साहात ग्राहक जागृतीतून शोषणमुक्त समाजनिर्मितीचा संकल्प; कार्यकर्त्यांचा स्नेह-परिचय मेळावा उत्साहात उत्तम लोखंडे सेलू | प्रतिनिधी : ग्राहकांचे हक्क, त्यांच्या समस्या आणि बाजारपेठेतील होणारे शोषण याविरोधात जनजागृती करण्यासाठी ग्राहक पंचायतचे कार्य अधिक व्यापक करण्याची गरज आहे. ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत सजग राहून संघटितपणे अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा स्थापना दिवस तसेच सेलू तालुक्यातील कार्यकर्त्यांचा स्नेह-परिचय मेळावा रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी गेना कॉम्प्लेक्स, पहिला मजला, सेलू येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते, ग्राहक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी स्वतःचा परिचय...

शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार — सुनील गायकवाड नूतन विद्यालयात पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

Image
शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार — सुनील गायकवाड नूतन विद्यालयात पालक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांचा सन्मान ✍️उत्तम लोखंडे , परभणी/ सेलू प्रतिनिधी   :  पालक शिक्षक संघाच्या वतीने नूतन विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संगीत विभागप्रमुख सच्चिदानंद डाखोरे व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक के. के. देशपांडे होते. यावेळी पालक शिक्षक संघाचे सहसचिव सुनील गायकवाड, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा हेमा मुळे, पूनम सोनी, कैलास लाटे, रंजीतराव जाधव, प्रशांत सोळंके, शत्रुघ्न पवार, विठ्ठल जाधव, पंकज चव्हाण, राजेभाऊ लेंगुळे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डी. बी. घोगरे व त्यांच्या पत्नी मथुरा घोगरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व पेन देऊन सन्मान करण्यात आला...

महाबळेश्वर–तापोळा मार्गावर बसचा ब्रेक फेल; मोठा अनर्थ टळला!चिखलीजवळ पाच प्रवासी जखमी; रमाबाई हिरवे यांना पुढील उपचारांसाठी वाईला हलवले — चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक, एसटी बसच्या तांत्रिक तपासणीची मागणी

Image
महाबळेश्वर–तापोळा मार्गावर बसचा ब्रेक फेल; मोठा अनर्थ टळला! चिखलीजवळ पाच प्रवासी जखमी; रमाबाई हिरवे यांना पुढील उपचारांसाठी वाईला हलवले — चालकाच्या प्रसंगावधानाचे कौतुक, एसटी बसच्या तांत्रिक तपासणीची मागणी तापोळा प्रतिनिधी : महाबळेश्वर–तापोळा मार्गावरील चिखली गावाजवळ प्रवासी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना सोमवारी घडली. बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असताना हा प्रकार घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत पाच प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर तळदेव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरहून तापोळ्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा चिखली परिसरात अचानक ब्रेक फेल झाला. डोंगराळ व वळणावळणाच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने बसमधील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, चालकाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवत प्रसंगावधानाने बस सुरक्षितपणे हाताळल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत पाच प्रवाशांना दुखापत झाली. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने तळदेव ग...

महाबळेश्वर–तापोळा मार्गावर चिखलीजवळ बसचा ब्रेक फेल; पाच प्रवासी किरकोळ जखमीस्थानिक नागरिकांनी धाव घेत केली मदत; जखमींवर तळदेव ग्रामीण रुग्णालयात उपचार

Image
महाबळेश्वर–तापोळा मार्गावर चिखलीजवळ बसचा ब्रेक फेल; पाच प्रवासी किरकोळ जखमी स्थानिक नागरिकांनी धाव घेत केली मदत; जखमींवर तळदेव ग्रामीण रुग्णालयात उपचार तापोळा प्रतिनिधी :   महाबळेश्वर–तापोळा मार्गावर चिखली गावाजवळ प्रवासी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असताना ही घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून, या घटनेत पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरहून तापोळ्याच्या दिशेने जाणाऱ्या बसचा चिखली परिसरात अचानक ब्रेक फेल झाला. बसमधील प्रवाशांना परिस्थितीची जाणीव होताच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने तळदेव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून, दुखापती गंभीर नसल्याची माहिती मिळाली आहे. घटना घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव...

स्वच्छ गाव–सुंदर गाव’चा संदेश घेऊन विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; सेलूतील रासेयोचा स्तुत्य उपक्रम

Image
‘स्वच्छ गाव–सुंदर गाव’चा संदेश घेऊन विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; सेलूतील रासेयोचा स्तुत्य उपक्रम हरिपाठाच्या मंगलमय गजराने अभियानाची सुरुवात; पावडे हदगाव, वाकी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ✍️उत्तम लोखंडे, परभणी/सेलू प्रतिनिधी :  “ स्वच्छ गाव–सुंदर गाव, स्वच्छ पर्यावरण–निरोगी जीवन! ” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. नूतन महाविद्यालय, सेलूच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने श्रीरामजी भांगडिया यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवानिमित्त आयोजित स्वच्छता व पर्यावरण सुरक्षा जनजागृती अभियानाचा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पावडे हदगाव आणि वाकी या गावांना भेट देत ग्रामस्थांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्त परिसर, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक जबाबदारीबाबत जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उपक्रमाला सामाजिक प्रबोधनाचे स्वरूप प्राप्त झाले. हरिपाठाच्या गजराने अभियानाची मंगलमय सुरुवात अभियानाची सुरुवात हरिपाठाच्या मंगलमय गजराने करण्यात आली. भक्तिमय ...

परभणी जिल्ह्यावर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट; सर्व तालुके ‘ट्रिगर-१’मध्ये आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ पावसातील मोठा खंड, पिके वाळण्यास सुरुवात; खरीप पिके वाचविण्यासाठी जलसाठ्यांचा नियोजनबद्ध वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Image
परभणी जिल्ह्यावर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट; सर्व तालुके ‘ट्रिगर-१’मध्ये आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ पावसातील मोठा खंड, पिके वाळण्यास सुरुवात; खरीप पिके वाचविण्यासाठी जलसाठ्यांचा नियोजनबद्ध वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ✍️उत्तम लोखंडे, परभणी प्रतिनिधी :  परभणी जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात झालेला अपुरा पाऊस, पावसातील मोठे खंड, प्रत्यक्ष पर्जन्यमान तसेच ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती आणि पिकांची सद्यस्थिती लक्षात घेता जिल्ह्यावर दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने आवश्यक माहिती शास्त्रीय पद्धतीने संकलित करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा , असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात ४ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हा दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची सद्यस्थिती, उपलब्ध जलसाठे आणि सिंचन व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संबंधित...

नाक्यावर स्वतः उतरले पोलीस निरीक्षक; अडीच तासांची वाहतूक कोंडी काही मिनिटांत दूर ! महाबळेश्वर पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांच्या थेट हस्तक्षेपाचे नागरिक व पर्यटकांकडून कौतुक

Image
नाक्यावर स्वतः उतरले पोलीस निरीक्षक; अडीच तासांची वाहतूक कोंडी काही मिनिटांत दूर ! महाबळेश्वर पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांच्या थेट हस्तक्षेपाचे नागरिक व पर्यटकांकडून कौतुक महाबळेश्वर प्रतिनिधी : श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील नाक्यावर रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वाहनांची संख्या वाढल्याने नाक्याच्या परिसरात वाहतूक मंदावली होती. तब्बल अडीच तासांपासून सुरू असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक हर्षद गालींदे यांनी स्वतः घटनास्थळी उभे राहून वाहतूक नियंत्रणाची धुरा हाती घेतली. परिस्थितीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गालींदे यांनी केवळ पोलिसांना सूचना देण्यापुरते मर्यादित न राहता स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली. नाक्यावर अडकलेल्या वाहनांना योग्य दिशेने मार्ग करून देत त्यांनी वाहतुकीचे नियोजन केले. एका बाजूने येणाऱ्या वाहनांना थांबवून दुसऱ्या बाजूची वाहतूक पुढे सोडणे, अडकलेल्या वाहनांना मार्ग मोकळा करून देणे आणि वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने सुरू ठेवण्याचे काम त्यांनी प्...

प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला किमान एक शिपाई द्या!शिक्षकांना अध्यापनासाठी मोकळे करा; विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर मोर्चा

Image
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला किमान एक शिपाई द्या! शिक्षकांना अध्यापनासाठी मोकळे करा; विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर मोर्चा सातारा प्रतिनिधी :   जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे, तसेच शिक्षकांना अध्यापनाच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला किमान एक शिपाई उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती कराडचे सदस्य संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हा परिषद परिसरात दाखल झालेल्या या मोर्चामध्ये ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत शाळांमधील शिपाई पदांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली. ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिपाई मिळालाच पाहिजे’, ‘शाळांचा दर्जा सुधारा’, ‘शिक्षकांना अध्यापनाचे काम करू द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांवर अध्यापनाबरोबरच शाळेच...

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; सातारा जिल्ह्यातील २९ शिक्षकांची गौरवासाठी निवड

Image
जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; सातारा जिल्ह्यातील २९ शिक्षकांची गौरवासाठी निवड सातारा प्रतिनिधी :   सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सन २०२६-२७ साठी देण्यात येणाऱ्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्राप्त प्रस्तावांचे मूल्यमापन करून विविध निकषांच्या आधारे पात्र ठरलेल्या २९ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतानाच शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शाळेच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल या निवडीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांच्या कार्याचे शैक्षणिक क्षेत्रातून कौतुक होत आहे. सन २०२६-२७ च्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये लोणंद मुली शाळेच्या मृणाल जाधव, सुरवडीच्या माधुरी सोनवलकर, दहिवडी नंबर १ शाळेचे सागर जाधव, के...

‘नमो उद्याना’च्या लोकार्पणातून सेलूच्या विकासाचे नवे पर्व; शहराचा कायापालट करण्याची पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्वाही

Image
‘नमो उद्याना’च्या लोकार्पणातून सेलूच्या विकासाचे नवे पर्व; शहराचा कायापालट करण्याची पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्वाही क्रीडा सुविधांसाठी २५ कोटींचा ‘खेलो इंडिया’ प्रस्ताव; महिला-बालकांसाठी ५० खाटांचे रुग्णालय, आयटीआय इमारत, वाढीव पाणीपुरवठा व भूमिगत ड्रेनेजसह विविध विकासकामांना गती ✍️उत्तम लोखंडे परभणी/सेलू प्रतिनिधी : सेलू शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देऊन नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. ‘नमो उद्याना’च्या लोकार्पणातून सेलूच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, आगामी काळात सेलू शहराचा कायापालट करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत , अशी ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. सेलू नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘नमो उद्याना’चे लोकार्पण पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, मुख्...

रघुवीर घाटातील महाकाय दरड अखेर हटवली; चार वाजता वाहतूक पूर्ववत! भूषण मोरे यांच्या पुढाकाराला यश; अनिकेत मोरे यांनी घटनास्थळी ठाण मांडून युद्धपातळीवर करून घेतले दरड हटविण्याचे काम

Image
रघुवीर घाटातील महाकाय दरड अखेर हटवली; चार वाजता वाहतूक पूर्ववत! भूषण मोरे यांच्या पुढाकाराला यश; अनिकेत मोरे यांनी घटनास्थळी ठाण मांडून युद्धपातळीवर करून घेतले दरड हटविण्याचे काम तापोळा प्रतिनिधी :   रघुवीर घाटामध्ये मोठी दरड कोसळल्याने ठप्प झालेली वाहतूक अखेर शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पूर्ववत करण्यात आली. श्री. भूषण मोरे यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या बंधू अनिकेत मोरे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून केलेल्या अथक प्रयत्नांमुळे दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. रघुवीर घाटात मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि दरडीचा भाग रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वाहनांना मार्गातच थांबावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. घटनेची माहिती मिळताच भूषण मोरे यांनी तातडीने यंत्रणा गतिमान करण्यासाठी पुढाकार घेतला. आवश्यक साधनसामग्री व कामगार उपलब्ध करून देत दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. या कामावर लक्ष ठेव...

सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Image
सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाचा खंड; सरसकट आर्थिक मदत, मागील व चालू वर्षाचा पीकविमा तातडीने वितरित करण्याची मागणी ✍️उत्तम लोखंडे परभणी/सेलू प्रतिनिधी सेलू तालुक्यात मागील दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सेलू तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा , या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला पाऊस समाधानकारक होईल, अशी अपेक्षा असल्याने सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच मोठ्या कष्टाने आर्थिक जुळवाजुळव करून पेरणी केली. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद, ऊस, कांदा, राजमा तसेच विविध फळबागांच...

सेलूच्या आधुनिक विकासाला नवी दिशा; सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण अंडरग्राउंड ड्रेनेज, गॅस पाइपलाईनसह आधुनिक सुविधांवर भर; सेलूला मराठवाड्यातील सुंदर शहर बनविण्याचा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा निर्धार

Image
सेलूच्या आधुनिक विकासाला नवी दिशा; सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण अंडरग्राउंड ड्रेनेज, गॅस पाइपलाईनसह आधुनिक सुविधांवर भर; सेलूला मराठवाड्यातील सुंदर शहर बनविण्याचा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा निर्धार ✍️उत्तम लोखंडे , परभणी/सेलू प्रतिनिधी  सेलू शहराच्या सर्वांगीण, आधुनिक आणि नियोजनबद्ध विकासासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त बनविण्यासोबतच आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाईल, अशी ग्वाही परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. सेलू येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन इमारतीसह शासकीय निवासस्थानाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलिंद सावंत , उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी , तहसीलदार डॉ. शिवाजी मगर , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय जाधव यांच्यासह वि...

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!