मोबाईल हरवला नव्हता, हरवली होती संवेदनशीलता!एस.टी.च्या एका प्रवासाने निर्माण केलेला अस्वस्थ करणारा प्रश्न
मोबाईल हरवला नव्हता, हरवली होती संवेदनशीलता! एस.टी.च्या एका प्रवासाने निर्माण केलेला अस्वस्थ करणारा प्रश्न लेखक : अमर सलागरे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी. महामंडळाशी राज्यातील सर्वसामान्य माणसाचे एक वेगळे नाते आहे. ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एस.टी. ही केवळ वाहतुकीचे साधन नसून त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य प्रवासी आजही मोठ्या विश्वासाने एस.टी.चा वापर करतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेने हा विश्वास आणि त्यामागील मानवी संवेदनशीलता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. अनेक वर्षांनंतर एस.टी.ने प्रवास करण्याचा योग आला. महाड ते कापडे हा माझा प्रवास MH 14 BT 4302 क्रमांकाच्या ठाणे–महाबळेश्वर बसमधून सुरू होता. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र पोलादपूर येथे घडलेल्या एका प्रसंगाने मन विषण्ण झाले. पोलादपूर बसस्थानकावर एक वयोवृद्ध गृहस्थ बसमध्ये चढले. बस सुटल्यानंतर काही क्षणांतच त्यांच्या लक्षात आले की त्यांचा मोबाईल फोन...