१०५ गावांचा सन्मान, सह्याद्रीच्या मातीचा अभिमान; महाबळेश्वर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव
१०५ गावांचा सन्मान, सह्याद्रीच्या मातीचा अभिमान; महाबळेश्वर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील १०५ गाव समाजासाठी भूषणावह ठरलेल्या महानगरपालिका निवडणुकीत दरे येथील श्री. प्रकाश दादा शिंदे, गोगवे येथील श्री. चंद्रकांत दादा अगुंडे, चकदेव येथील श्री. लक्ष्मण दादा जंगम, अहिरे-वाणवली येथील सौ. दिपाली ताई सुरेश सकपाळ, वारसोळी येथील श्री. शंकर दादा मोरे तसेच रुळे येथील श्री. तुळशीराम दादा शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या घवघवीत विजयामुळे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, जनतेने विश्वासाने दिलेल्या कौलाला पात्र ठरण्याची जबाबदारी विजयी उमेदवारांनी स्वीकारली आहे.
या निवडणुकीत सह्याद्रीच्या मातीचा पवित्र बाणा, प्रामाणिकपणा आणि नित्यसेवेचा संस्कार मतपेटीतून ठळकपणे व्यक्त झाल्याचे चित्र दिसून आले. स्थानिक विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत विजयी उमेदवारांनी प्रचारादरम्यान जनतेशी थेट संवाद साधला होता. त्या संवादाला आणि कामगिरीला मिळालेला कौल हा लोकशाहीचा खरा उत्सव ठरल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
विजयानंतर तालुक्यातील विविध गावांतून विजयी उमेदवारांवर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होत असून, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक घटकांनी त्रिवार अभिनंदन करत पुढील काळात पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभाराची अपेक्षा व्यक्त केली आहे. सह्याद्रीच्या मातीचा अभिमान जपत सत्य आणि नित्यसेवेच्या वाटेवरून तालुक्याच्या विकासाचा वेग अधिक वाढवावा, हीच १०५ गाव समाजाची सामूहिक भावना असून, विजयी उमेदवारांना कोटी कोटी शुभेच्छा देत महाबळेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment