मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नांना यश : भूमिगत वीजवाहिन्यांना प्रशासकीय मान्यता जनतेची मोठी अपेक्षा पूर्ण — आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा निर्णय.
कुंभरोशी प्रतिनिधी (जितेंद्र कारंडे)
सातारा जिल्ह्यातील वाई व महाबळेश्वर तालुक्यांसाठी भूमिगत वीजवाहिन्यांची कामे शासनाने मंजूर केली आहेत. या निर्णयामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी या प्रश्नाला सातत्याने प्राधान्य दिले.
पावसाळ्यात वादळे, भूस्खलनामुळे होणारा वीजपुरवठ्याचा अडथळा त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि त्यावर तोडगा म्हणून भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रस्ताव शासनासमोर मांडला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येणार आहे.
४ जून २०२५ रोजी झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेत आला. सुरुवातीला निधी इतरत्र वळवण्याचा विचार होता; मात्र पाटील यांच्या भूमिकेमुळे सातारा जिल्ह्यासाठी ही कामे मंजूर झाली.
लोनंद–पालखीतळ – ₹12.22 कोटी
महाबळेश्वर – ₹8.05 कोटी
पाचगणी – ₹9.55 कोटी
वाई विभाग – ₹10.01 कोटी
एकूण निधी : ₹40 कोटींपेक्षा अधिक | कालावधी : १८ महिने
महाबळेश्वर-पंचगणीसारख्या पर्यटनस्थळांवर अखंडित वीजपुरवठा होणार असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच पर्यटक सर्वांना याचा लाभ मिळेल.
स्थानिकांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की,
"वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी पाटील यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. आता कामे वेळेत पूर्ण व्हावीत हीच अपेक्षा आहे."
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले –
"आपत्तीच्या काळात वीजपुरवठा खंडित होणे ही गंभीर समस्या आहे. जनतेच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करून आम्ही काम मंजूर करवून घेतले आहे. आता अंमलबजावणीला गती देणे हेच पुढील उद्दिष्ट आहे."
भूमिगत वीजवाहिन्यांचा हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यात मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या प्रयत्नांची नोंद नागरिकांनी घेतली असून, हा निर्णय साताऱ्याला दिलासा देणारा ठरणार आहे.
Comments
Post a Comment